Join us
Daily Top 2Weekly Top 5

तारिख पे तारिख लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे या टीव्ही कपलच्या लग्नाला मुहुर्तच मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:06 IST

लग्नाच्या तारखेला नोंदणीकृत लग्न करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर या जोडप्यासह त्यांचे प्रियजनही निराश झाले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहताच १५ एप्रिल पर्यंतचे लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत वाढले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांनी लग्नसमारंभासारखे कार्यक्रम रद्द केले होते. यात एका टीव्ही कपलच लग्न हे १५ एप्रिलला होणार होते. सर्व काही ससुरळीत होईल अशी आशा या कपलला होती. मात्र तसे काही झाले नाही. उलट लॉकडाऊन वाढला आणि आता या कपलला पुन्हा त्यांच्या लग्नासाठी नवीन तारखेचा मुहूर्त शोधावा लागणार आहे. 

वेगवेगळ्या टेलिव्हिजन शो आणि सिनेमात भाग घेणारी पूजा बॅनर्जी यांनी तिच्या विवाहास्पद स्वप्नांमध्ये कधीही विचार केला नसेल की तिच्या लग्नात बरेच चढ उतार येतील. ‘जग जाननी  माँ  वैष्णो देवी - कहानी माता रानी की’ कार्यक्रमातील माँ वैष्णोव्यक्तिरेखा साकारणारी  अभिनेत्री १५ एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकणार होती.

लॉकडाऊन आता ३ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. कुणाल वर्मा आणि पूजा बॅनर्जी यांनी फार पूर्वीपासून त्यांच्या स्वप्नातल्या लग्नाची योजना आखली होती. ही जोडपे 12 वर्षांहून अधिक काळ एकत्र आहेत आणि त्यांचे दोन्ही कुटुंबीय हा शुभ कार्यक्रम साजरा करण्यास तयार आहेत.पण आता चालू असलेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊन दिल्याने त्यांनी त्यांचे सर्व उत्सव रद्द केले आहेत आणि मूळ लग्नाच्या तारखेला नोंदणीकृत लग्न करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर या जोडप्यासह त्यांचे प्रियजनही निराश झाले आहेत.  

कुणाल म्हणाला, “माझी आई लग्नाबद्दल खूप उत्सुक होती आणि संपूर्ण कुटुंबासाठी शॉपिंग केली होती. तिला हा लग्नसोहळा धूम धडाक्यात करायचा होता  . तिची स्वप्ने पूर्ण होत नाहीत हे पाहून माझे मन तुटले आहे, परंतु मला आणखी काही महिने थांबण्याची इच्छा नाही. पूजा आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि लग्न हे आमच्यासाठी फक्त एक स्वाक्षरी लांब आहे, परंतु जितक्या लवकर हे घडते तितके चांगले. ”

टॅग्स :पूजा बॅनर्जीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस