Join us

'भारत योग्य मार्गावर, २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होणार'- अमिताभ कांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:51 IST

Indian Economy: जी-२० चे शेर्पा अमिताभ कांत यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठा विश्वास व्यक्त केला आहे.

Indian Economy: भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. चौथ्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा चांगले जीडीपी वाढीचे आकडे हेच दर्शवतात. दरम्यान, भारतीयअर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून, २०४७ पर्यंत ती ३० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा विश्वास जी२० शेर्पा अमिताभ कांत यांनी व्यक्त केला आहे. ते नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (आयएटीए) एका कार्यक्रमात बोलत होते.

पश्चिमेकडील देश म्हातारे, भारत तरुण....कार्यक्रमात बोलताना अमिताभ कांत यांनी देशाच्या लोकसंख्याशास्त्रीय फायद्यावर आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला आणि सांगितले की, भारत त्याच्या तरुण लोकसंख्येच्या आणि जलद शहरीकरणाच्या बळावर २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे जगाचा पश्चिम भाग म्हातारा होत आहे, जपान आधीच म्हातारा झाला आहे, तर दुसरीकडे चीनचीही स्थिती वाईट आहे. पण, भारतीय लोकसंख्याशास्त्र खूपच तरुण आहे.

कांत यांच्या मते, भारताचे लोकसंख्याशास्त्रीय वय फक्त २८ वर्षे आहे आणि आपण १०० वर्षांचे झाल्यावरही सरासरी वय ३५ वर्षे असेल. भारत नुकताच जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून, ४ ट्रिलियन डॉलर्सचा आकडा गाठला आहे. जेव्हा भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल, म्हणजेच २०४७ पर्यंत हा आकडा सुमारे ३० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकतो, असेही त्यांनी म्हटले.

500 नवीन शहरे निर्माण करावी लागतीलअमिताभ कांत यांनी शहरीकरणाचे प्रमाण देखील अधोरेखित केले. ते म्हणाले, पुढील ५ दशकांत तुम्हाला दोन नवीन अमेरिका निर्माण करण्याची आवश्यकता आहे, तर दर पाच वर्षांनी भारतात एक शिकागो निर्माण करण्याची आवश्यकता आहे. हे भारतासाठी मोठे आव्हान आहे. कांत यांच्या मते, येत्या काही वर्षांत आपल्याला ५०० नवीन शहरे बांधावी लागतील.

विमान वाहतूक क्षेत्र महत्त्वाचेभारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना, त्यांनी विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीतील भूमिकेलाही महत्त्वाचे म्हटले. भारत ४०० विमानतळ बांधण्याची आकांक्षा बाळगतो, सध्या देशात १५० हून अधिक विमानतळ कार्यरत आहेत. तुम्हाला उत्तम विमानतळांची, उत्तम विमान कंपन्यांची गरज आहे. इंडिगो आणि एअर इंडियाने त्यांच्या वाइड बॉडी विमानांसह एमिरेट्स, कतार एअरवेजशी स्पर्धा करावी, असेही त्यांनी सुचवले.

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारत