Join us  

मोदी, कोहली, शेअरबाजार... कोण कधी चालेल नेम नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 8:45 AM

पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल, कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा केलेला पराभव, डिसेंबर २०१८ पासून शेअरबाजारातील निर्देशांकात झालेले वादळी बदल, या तिन्ही घटकांचा तसा एकमेकांशी फारसा संबंध नसला तरी यात साम्यही आहे आणि फरकही आहे.

पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल, कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा केलेला पराभव, डिसेंबर २०१८ पासून शेअरबाजारातील निर्देशांकात झालेले वादळी बदल, या तिन्ही घटकांचा तसा एकमेकांशी फारसा संबंध नसला तरी यात साम्यही आहे आणि फरकही आहे. मूळात राजकारण, क्रिकेट आणि शेअरबाजार यात कोण कधी चालेल, कधी खेळेल आणि कधी छळेल हे सांगता येत नाही.महिना-दीड महिनापूर्वीच्या या सगळ्या घटना ....१. ११ डिसेंबर २०१८ रोजी पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले .२. अ‍ॅडलेड क्रिकेट कसोटीत विराट कोहलीच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला ३१ धावांनी पराभूत केले. ३. डिसेंबर २०१८ पासून आपल्या मुंबई शेअरबाजाराच्या निर्देशांकात झालेले वादळी बदल. सहजच मनात आले की, या तिन्ही घटकांचा तसा एकमेकांशी फारसा संबंध नसला तरी यात किती साम्य आहे ना, आणि फरकही...मिझोराम, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ११ डिसेंबरला जाहीर झाले. यापैकी मिझोराम आणि तेलंगणा या राज्यात विद्यमान सरकार केंद्रात सत्तारुढ असलेल्या भारतीय जनता पक्षाची नव्हती. या निवडणुकीत ती येण्याची सुतराम शक्यता नव्हती. या दोन्ही विधानसभात, विशेषत: मिझोराममध्ये भाजपाने खाते उघडले तरी पुष्कळ अशी परिस्थिती होती. तसेच झाले या दोन्ही राज्यात. ...झाला तो निव्वळ फायदा. शेअरबाजाराच्या भाषेत ‘नेट गेन’ क्रि केटच्या परिभाषेत कसोटी क्रि केटमध्ये रोहित शर्मा खेळणे, ...एक चांगला झेल घेतला ना ...उत्तम. तेवढे तर तेवढे... कोण तरी म्हणे त्यातल्या त्यात ....असला सगळा मामला... जे काही मिळेल ते पदरात पाडून घेणे असं काही. निवडणुका, क्रिकेट, शेअरबाजारात (मोदी, कोहली, शेअरबाजार) यांत हे साम्य.छत्तीसगड विधानसभेत जे आताच्या निकालात झाले, ते अगदीच एकदमच अनपेक्षित. डॉ.रमण सिंग यांनी खरंच खूप चांगले काम केले होते आणि आहे. २०२४ च्या निवडणुकीत ते कोणत्याही पदाचे उमेदवार असण्याची त्यांचे वय बघता, शक्यता नाही. केंद्र सरकारच्या योजनांचा व्यवस्थित उपयोग करून घेत गेली १५ वर्षे हा मुख्यमंत्री राज्याचा विकास करत होता. उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड ही तीन स्वतंत्र राज्य म्हणून साधारणत: एकाचवेळी अस्तित्त्वात आली. या तीन राज्यातच नव्हे, तर देशभरात गेली अनेक वर्षे सर्वात जास्त दराने विकास करणाऱ्या पहिल्या तीन राज्यात छत्तीसगडचा क्रमांक लागतो.गेली १५ वर्षे डॉ. रमण सिंग उर्फ चावलवाले बाबा मुख्यमंत्री आहेत. अशावेळी कदाचित त्यांच्या शेवटच्या विधानसभा निवडणुकीत असा पराभव होणे हे अनुचित वाटते. अगदी अ‍ॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात चांगला सेट झालेला असताना अजिंक्य रहाणेने रिव्हर्स स्वीप मारत बाद होण्यासारखेच जणू. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे ‘चावलवाले बाबा’ आहेत. रमण सिंगांसारखेच फालतू बडबड न करता आपले निहित काम करत राहणारे. हे भाषण सुद्धा आरडाओरड करून करत नाहीत ....तर हे किंवा यांच्या पत्नी काय चर्चाप्रवण सेल्फी काढणार!रमणसिंग - अजिंक्य रहाणे - चेतेश्वर पुजारा यांचे शेअरबाजारातले सम - वृत्तीन म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स. त्या निर्देशांकात काय व्हायचे असेल ते होवो, ही सगळीच मंडळी म्हणजे आपण बरं आणि आपलं काम बरं अशी. चेहºयावर आणि वागण्यातही एक ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन्’ अशीच. त्यामुळे ना यापैकी कोणाला ‘मित्रो...’ अशी साद घालावी लागत, ना अध्यक्ष महाराज असं प्रत्येक वाक्यात म्हणावा लागतं, ना स्वभावापेक्षा वेगळे वागत कविता म्हणावी लागत, यांच्यापैकी कोणीच फ्लॅशी नाही आणि म्हणूनच जनता यांना साद घालते. एकमेकांना एकमेकांच्या मर्यादा माहिती असूनही... कारण हे सगळेच स्वत:चाही आणि पुढच्याचाही आब राखून असतात. त्यामुळे यांच्यापैकी कोणाचंही तोंडघशी पडणे जिव्हारी लागते, किमान आपल्या तरी नक्कीच !अ‍ॅडलेड क्रिकेट कसोटीत कसं पहिल्या डावात अजिंक्य रहाणे नावाचा चावलावाला बाबा जरी चालला नाही, तरी चेतेश्वर पुजारा नावाचा चावलवाला बाबा दोन्ही डावात चालला. आता विधानसभा निवडणुकीत डॉ. रमणसिंग छत्तीसगडमध्ये चालले नसले तरी मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान चालले तसे. अ‍ॅडलेड कसोटीतली चेतेश्वर पुजाराची फलंदाजी आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात तसंही साम्य आहे. दोन्ही ठिकाणी पुजारा आणि शिवराजसिंह त्यांच्या त्यांच्या गटांचे तारणहार ठरले. पण पुजाराचे शतक झाले नाही आणि शिवराजसिंहना बहुमत काही मिळाले नाही!पुजारा, रहाणे आणि शिवराजसिंह मनोमन हेच म्हणत असतील की, कर्नाटक निवडणुकांनंतर केला तसा अतिसाहसवाद नको करू देत म्हणजे मिळवलं. कारण भाजप काय, क्रिकेट काय आणि शेअरबाजार काय, खेळतात वेगळेच आणि छळतात वेगळेच. असे पुजारा-रहाणे आणि शिवराजसिंह शेअरबाजारातही असतातच की! आणि आताच्या या बाजारातही आहेतच की !रोहित शर्माने त्याच्या वकूबानुसार सातत्याने कसोटी क्रि केटमध्ये खेळणं, हे अयोध्येत राममंदिर होण्यासारखे आहे, अशक्य नाही; पण कधी होईल ते सांगता येतं नाही. कदाचित त्यांचे त्यांनाही नाही. एकदम तू रडल्यासारखे कर आणि मी मारल्यासारखे करतो, असे कोहली आणि रोहित शर्मा यांपैकी कोण कोणाला म्हणते हे कळत नाही आणि तसेच मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही आहे. कारण आपण भावनिक गुंत्यात अडकायला सदैव तयारच असतो, याचं पूरेपूर भान या सगळ्यांना आहे, अगदी शेअरबाजारात सुद्धा.सगळेच राहुल राहुल द्रविड नसतात, नसतातच. पण अलिकडचे राहुल कधी कधी पावतात. या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी काँग्रेसला पावले तसे आणि अ‍ॅडलेड क्रिकेट कसोटीत दुसऱ्या डावात काही प्रमाणात के. एल. राहुल पावला तसा. सध्याच्या वादळी बाजारातही असे काही राहुल पावले आहेतच की !अ‍ॅडलेड क्रि केट कसोटी भारतीय संघ जिंकला जेमतेम ३१ धावांनी. ऑस्ट्रेलियाची आजपर्यंतची सगळ्यात दुबळी, फलंदाजी वगैरे ज्याचे वर्णन केले जाते होते, त्या संघाविरुद्ध. त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात आपल्यावर रडायची वेळ आणली होती. अश्विन दुसऱ्या डावात एक विकेट मिळवायला झगडत असताना ऑस्ट्रेलियाचा नथन लायन सहा विकेट घेत होता. पाचपैकी एकही विधानसभा निर्विवादपणे हाती येतं नाही असं असताना... शेअरबाजाराचा तर प्रश्नच नाही ...इथे सदैवच ‘Past Performance is not a guarantee’.(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.) 

टॅग्स :नरेंद्र मोदीशेअर बाजारविराट कोहली