Join us

भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:55 IST

पाहा काय केलंय चीननं आणि सरकार आता कोणते प्रयत्न करत आहे.

चीननंभारतासह अनेक देशांना रेअर अर्थ मॅग्नेटची निर्यात बंद केली आहे. यामुळे ईव्ही उद्योगतसेच भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाला मोठा फटका बसतोय. जगातील रेअर अर्थ एलिमेंट मायनिंगमध्ये चीनचा हिस्सा ७० टक्के आणि जागतिक उत्पादनात चीनचा वाटा ९० टक्के आहे. त्याच्या पुरवठ्यासाठी भारत सरकार चीनशी बोलणी करत आहे. त्याचबरोबर रेअर अर्थ मॅग्नेटच्या पुरवठ्यासाठी अन्य पाच देशांशी बोलणी सुरू केली आहेत. यामध्ये व्हिएतनाम, इंडोनेशिया, जपान, अमेरिका आणि रशियाचा समावेश आहे.

भारत ८०९ टन रेअर अर्थ मॅग्नेट आयात करतो. हिंदू बिझनेसलाइननं दिलेल्या वृत्तानुसार, वाहन कंपन्यांकडे जून अखेरपर्यंत स्टॉक शिल्लक आहे. याचं कारण म्हणजे एप्रिलच्या मध्यापासून पुरवठा होत नाही. सरकार हा प्रश्न राजनैतिक मार्गानं सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावास भारतीय उद्योगांचे प्रतिनिधी आणि चिनी सरकारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे.

आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?

सर्वोत्तम पर्याय कोणता?

व्हिएतनाम आणि इंडोनेशियाकडून रेअर अर्थ खरेदी करण्याची शक्यता अधिक असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जपानमध्येही रेअर अर्थ मॅग्नेट्स आहेत पण त्यांची गुणवत्ता चीनइतकी चांगली नाही. व्हिएतनाम हा सर्वात योग्य पर्याय आहे कारण तेथून ताबडतोब पुरवठा साखळी स्थापित करणं सोपं आहे. आशियाई देशांकडून पुरवठा साखळी स्थापन करण्यासाठी ४५ दिवस लागू शकतात, तर रशिया आणि अमेरिकेच्या बाबतीत ते ६० दिवस लागू शकतात.

चीनमधून रेअर अर्थ मॅग्नेट्सचा पुरवठा बंद केल्याने वाहन उद्योगासह इलेक्ट्रॉनिक उद्योगावर, विशेषत: स्मार्टवॉच आणि वायरलेस इयरबड्सच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होईल, असं सूत्रांचं म्हणणे आहे. कंपन्यांकडे आता केवळ काही महिन्यांचा साठा शिल्लक असून या दरम्यान चीनमधून पुरवठा सुरळीत झाला नाही तर त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. यामुळे रेअर अर्थ मॅग्नेटचा वापर होणाऱ्या वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. देशातील स्मार्टवॉचच्या विक्रीत पहिल्या तिमाहीत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे.

टॅग्स :भारतचीन