Join us

मागील १० वर्षांत भारतात मोबाइलची मागणी तिप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 06:47 IST

Mobile Demand in India: भारताचे नाव आता ‘स्मार्टफोन’च्या आघाडीचा उत्पादक देशांमध्ये घेतले जात आहे. जगभरात भारतात तयार केलेल्या स्मार्टफोनच्या निर्यातीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. असे असतानाच देशांतर्गत मोबाईलची मागणीही आकाशाला भिडल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली  - भारताचे नाव आता ‘स्मार्टफोन’च्या आघाडीचा उत्पादक देशांमध्ये घेतले जात आहे. जगभरात भारतात तयार केलेल्या स्मार्टफोनच्या निर्यातीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. असे असतानाच देशांतर्गत मोबाईलची मागणीही आकाशाला भिडल्याचे दिसत आहे. २०१४ या आर्थिक वर्षात देशात १२ अब्ज डॉलर इतक्या मूल्याच्या मोबाइलची विक्री झाली. २०२४ पर्यंत यात सरासरी वार्षिक १३ टक्के दराने वाढ झाली आहे. सरकारच्या मेक इन इंडिया आणि उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनांमुळे मोबाईल निर्मिती उद्योग चांगलाच बहरला आहे. 

टॅग्स :मोबाइलभारत