चंद्रकांत दडसलोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: आयपीओ म्हणजे गुंतवणूकदारांसाठी पैसा कमावण्याची मोठी संधी असते. मात्र २०२१ ते २०२४ दरम्यान भारतीय शेअर बाजारात आलेल्या २५० आयपीओंपैकी ४८ टक्के आयपीओंनी गुंतवणूकदारांना निराश केले आहे. या कंपन्यांचे शेअर्स लिस्टिंग प्राइसपेक्षा खाली ट्रेड करत आहेत. सॅमको सिक्युरिटीजने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
अनेक कंपन्या उंच किमतीत शेअर्स विकतात, आणि लिस्टिंगनंतर काही दिवसांतच भाव गडगडतो. अनेक कंपन्यांसाठी आयपीओ केवळ ‘प्रमोटर्ससाठी एक्झिट प्लॅन’ ठरतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ६ महिन्यांत परतावा फक्त १२% आणि १२ महिन्यांमध्ये २३% इतकाच आहे. यामुळे संपत्ती निर्माण करण्याचे टार्गेट गाठणे अशक्य झाले.
सरासरी रिटर्न्स आयपीओ लिस्टिंगनंतर मिळाले असून, घेतलेली रिस्क आणि अस्थिरतेच्या तुलनेत ते फारसे आकर्षक नाहीत.
आयपीओ लिस्टिंग प्राइसपेक्षा खाली ट्रेड होत आहेत. याचा अर्थ यात गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
आयपीओंनी निफ्टी स्मॉलकॅप २५० पेक्षा कमी रिटर्न्स दिले आहेत. केवळ एकच आयपीओ स्मॉलकॅपला मागे टाकू शकला.
गुंतवणूकदारांनी काय करायला हवे?कंपनीचा नफा, उत्पन्न, कर्ज इत्यादी तपशीलांचा अभ्यास करा. आयपीओच्या किंमतीत काही अतिरंजकपणा तर नाही ना, हे पहा.कंपनी जमा होणारा पैसा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरणार आहेत का, की कर्ज फेडण्यासाठी? हे समजून घ्या. थेट अर्ज करण्याऐवजी, काही वेळ थांबून बाजारातील वास्तव समजून घेऊन गुंतवणूक करणे हितावह ठरू शकते.