India-US Trade Agreement: गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर चर्चा सुरू आहेत. परंतु अद्यापही करारावर अंतिम निर्णय झालेला नाही. याच दरम्यान, मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांनी एक मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या मते, पुढील काही महिन्यांत भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होण्याची अपेक्षा आहे. टॅरिफबद्दल काळजी करण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांची भविष्यवाणी अनेक प्रकारे खूप महत्त्वाची आहे.
विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% टॅरिफची घोषणा केली आहे. त्यांनी रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर भारताविरुद्ध नाराजीही व्यक्त केली आहे. "भारताची भूमिका खूप मजबूत आहे. अमेरिकेनं भारतावर २५% टॅरिफ लादला असला तरी, त्याचा औषध निर्माण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी सारख्या भारताच्या महत्त्वाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यांनी सूचित केले की ही संपूर्ण धडपड भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून अमेरिकेच्या बाजूने अधिक अनुकूल करार करता येईल," असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
सौरभ मुखर्जी यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटशी झालेल्या संवादादरम्यान सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. "अमेरिकेला भारताची दोन मुख्य क्षेत्रांमध्ये गरज आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि फार्मास्युटिकल्सचा समावेश आहे. अॅपलसारख्या कंपन्या भारतात उत्पादन वाढवत आहेत. अमेरिका आपल्या औषध घटकांच्या (एपीआय) पुरवठ्यासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करू इच्छिते. यासाठी भारत हा एक मजबूत पर्याय आहे," असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या निर्यातीवर परिणाम नाही
मुखर्जींचा असा विश्वास आहे की बाजारपेठेतील कोणत्याही घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहिलं पाहिजे. त्यांची फर्म या धोरणानुसार गुंतवणूक करत आहे. ते म्हणतात की व्हिएतनामसारखे देश अमेरिकेसाठी भारताचा पर्याय असू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता नाही.
"अमेरिकेने केलेल्या २५% कर वाढीचा भारतातील औषध, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी सारख्या महत्त्वाच्या निर्यातीवर परिणाम होणार नाही. फक्त कापड आणि ऑटो सारख्या काही क्षेत्रांवर मर्यादित परिणाम होईल. जरीही २५% कर लागू झाली तरी औषध, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी यांना पूर्णपणे सूट मिळण्याची शक्यता आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
भारतावर दबाव आणण्याचे प्रयत्न
मार्केलसचा असा विश्वास आहे की बाजारात कोणत्याही प्रकारची घसरण ही खरेदी करण्याची चांगली संधी आहे. 'जर सोना कॉमस्टार किंवा डिव्हिस लॅब्स सारख्या कंपन्यांचे शेअर्स पडले तर आम्ही अधिक खरेदी करण्याचा विचार करू. आपल्या कंपनीची जागतिक रणनीती अमेरिकेच्या टॅरिफ धमक्यांनंतर बाजारात आलेल्या घसरणीचा फायदा घेणं आहे, असं ते म्हणाले. ते विनोदाने त्याला टॅको म्हणजेच 'ट्रम्प ऑलवेज चिकन आऊट' ट्रेड म्हणतात.
टॅरिफ व्यतिरिक्त, इलेक्ट्रॉनिक्स आणि फार्मास्युटिकल्स सारख्या दोन महत्त्वाच्या क्षेत्रात अमेरिकेला भारताची खूप गरज आहे. त्यांच्या मते, अॅपल एक स्टार खेळाडू आहे. अॅपलनं भारतात उत्पादन वाढवणं ही महत्त्वाची बाब आहे. अमेरिका अमेरिकन कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी भारताची बाजारपेठ उघडण्यासाठी दबाव आणत आहे. भारत या प्रकरणाला बऱ्याच काळापासून विरोध करत आहे. तरीही, त्यांना विश्वास आहे की पुढील काही महिन्यांत एक करार होईल, असंही मुखर्जी म्हणाले.