लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतातील नोकऱ्यांच्या बाजारात सध्या मोठ्या घडामोडी दिसत आहेत. ‘नोकरी जॉबस्पीक मे २०२५’च्या अहवालानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग या क्षेत्रांमध्ये वरिष्ठ स्तरावर अनुभवी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे. कंपन्यांना कौशल्यांची जाण असलेल्या मनुष्यबळाची गरज भासत आहे.
विविध उद्योगांतील भरतीचा ट्रेंड पाहता एआय, विमा, रिअल इस्टेट आघाडीवर राहिले, तर आयटी, टेलिकॉम, रिटेल आणि बँकिंग क्षेत्रात घट नोंदवली गेली आहे. विमा क्षेत्रात भरतीत ६% वाढली असून फ्रेशर भरती २६% वाढली आहे. एफएमसीजी क्षेत्रात २% वाढ झाली. बँकिंग, क्षेत्रात ९% घट झाली असली तरी युनिकॉर्न कंपन्यांत २९% वाढ झाली आहे.
कोणत्या शहरांमध्ये भरतीत वाढ?
शहर वाढीचे प्रमाण
- कोची ८%
- हैदराबाद ७%
- जोधपूर ७%
- कोईम्बतूर ६%
- लखनऊ ५%
- रायपूर ४%
- चेन्नई ३%
- गांधीनगर ३%
- वडोदरा ३%
- कोलकाता २%
- बंगळुरू २%
- उदयपूर २%
- सुरत १%
- रांची १%
ठळकपणे लक्षात आले की मेट्रो शहरांमध्ये एआय आणि मशिन लर्निंग क्षेत्रात हायरिंगचा वेग सातत्यपूर्ण आहे. वरिष्ठ पदांवर मागणी ही मागील वर्षभर टिकून आहे, तर फ्रेशर्सची नॉन-टेक क्षेत्रांमध्ये वाढली आहे. हा तरुण प्रतिभेसाठी सकारात्मक संकेत आहे.- डॉ. पवन गोयल, मुख्य व्यवसाय अधिकारी, नोकरी