World Economic Forum : इंटरनेटच्या क्रांतीनंतर जगाने जे बदल अनुभवले, त्यापेक्षा कित्येक पटीने मोठे वादळ 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या रूपाने धडकणार आहे. दुबईतील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६'मध्ये बोलताना प्रसिद्ध उद्योजक हुसैन सजवानी यांनी जागतिक रोजगार बाजाराबाबत, विशेषतः भारताबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. एआयमुळे जग १० पट नाही, तर १०० पटीने बदलेल आणि याचा सर्वाधिक फटका 'आऊटसोर्सिंग'वर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थांना बसेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.
आऊटसोर्सिंग हबला धोका?'डेमॅक ग्रुप'चे संस्थापक आणि अध्यक्ष हुसैन सजवानी यांनी स्पष्ट केले की, ऐतिहासिकदृष्ट्या ऑटोमेशनने नेहमीच मानवी श्रमाची जागा घेतली आहे. एआयच्या बाबतीत हे अधिक वेगाने घडत आहे. जे देश आपल्या स्वस्त आणि कुशल मनुष्यबळाच्या जोरावर जगाचे 'बॅक-ऑफिस' बनले आहेत, त्यांच्यासमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
विश्लेषणातून समोर आलेल्या प्रमुख बाबी
- जे काम करण्यासाठी पूर्वी तासनतास मनुष्यबळ लागत होते, ते काम आता एआय काही सेकंदात पूर्ण करत आहे.
- इंटरनेटने संवादाची पद्धत बदलली, पण एआय निर्णय घेण्याची आणि काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल.
- जे देश या बदलाशी तातडीने जुळवून घेणार नाहीत, त्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान टिकवणे कठीण जाईल.
भारतासाठी हा इशारा चिंतेचा का?
- भारत हा जगाचा 'आऊटसोर्सिंग हब' मानला जातो. देशाच्या जीडीपीमध्ये आयटी, बीपीओ, कॉल सेंटर्स आणि बॅक-ऑफिस सेवांचा मोठा वाटा आहे.
- या क्षेत्रात लाखो तरुण काम करतात. एआय आधारित ऑटोमेशनमुळे 'डेटा एंट्री' किंवा 'बेसिक कोडिंग' सारख्या कामांची गरज कमी होत आहे.
- गेल्या काही वर्षांत मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये झालेली कर्मचारी कपात हे एआयच्या प्रभावाचे प्राथमिक संकेत मानले जात आहेत.
संधी की संकट? तज्ज्ञांचे मतसजवानी यांनी इशारा दिला असला तरी, अनेक तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, एआयमुळे जुन्या नोकऱ्या जातील, पण 'एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग' सारख्या नव्या उच्च दर्जाच्या नोकऱ्या निर्माण होतील. भारताला आता 'स्वस्त मजुरी' कडून 'उच्च तंत्रज्ञान' कौशल्यांकडे वेगाने वळावे लागेल.
Web Summary : AI's rapid advancement threatens India's outsourcing hub status, warns a World Economic Forum expert. Automation replaces human labor, impacting IT, BPO, and call centers. India must shift to high-tech skills to remain competitive.
Web Summary : विश्व आर्थिक मंच के एक विशेषज्ञ ने चेतावनी दी है कि एआई की तेजी से उन्नति भारत के आउटसोर्सिंग हब की स्थिति को खतरे में डालती है। स्वचालन मानव श्रम की जगह लेता है, जिससे आईटी, बीपीओ और कॉल सेंटर प्रभावित होते हैं। भारत को प्रतिस्पर्धी बने रहने के लिए उच्च तकनीक कौशल की ओर बढ़ना चाहिए।