Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर LIC ने मोठा निर्णय घेतला आहे. एलआयसीने या घटनेतील मृतांच्या नातलगांसाठी क्लेम सेटलमेंट प्रक्रिया आणखी जलद केली आहे. एलआयसीने म्हटले की, ते या अपघातात बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यास वचनबद्ध आहेत. तसेच, दावेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बाधित कुटुंबांचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.
एलआयसीने या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. शुक्रवारी या घटनेबाबत एक प्रेस रिलीज जारी करत एलआयसीने म्हटले की, आम्ही क्लेम सेटलमेंट प्रक्रिया शक्य तितकी सोपी करत असून, या अपघातातील मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत मृत्यू प्रमाणपत्राऐवजी केंद्र, राज्य सरकार आणि एअरलाइनने दिलेला कोणताही पुरावा स्वीकारला जाईल.
विमान अपघातात २६५ लोकांचा मृत्यूएअर इंडियाच्याअहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एआय-१७१ विमानाचा गुरुवारी(१२ जून २०२५) भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर विमान लगेच कोसळले. या अपघाता विमानातील २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ र्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. याशिवाय, ज्या भागात विमान कोसळले, त्या भागातील सुमारे ५५ लोकांनाही आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर सरकारने उच्चस्तरिय चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान मोदींची घटनास्तळी पाहणीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अपघातस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी हेदेखील होते. तर, गृहमंत्री अमित शाहा यांनी कालच घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला होता.
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;