नवी दिल्ली - भारतीय रुपयासाठी चालू आर्थिक वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. अनिवासी भारतीयांना भारतात गुंतवलेली 94 अब्ज डॉलरची गुंतवणूक यावर्षी मॅच्युअर होणार असून, त्यांनी ही गुंतवणूक काढून घेतल्यास रुपयाचे मूल्य कोलमडण्याची शक्यता आहे. अनिवासी भारतीयांकडून भारतात गुंतवलेली रक्कम एकाच वेळी काढून घेण्यात येणार नाही. मात्र पाश्चिमात्य देश आणि भारतामधील व्याजदरात फारसा फरक न राहिल्याने काही खाती बंद होऊ शकतात. बरेच अनिवासी भारतीय दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक करण्यावर भर देतात. आता घटत असलेला व्याजदरही यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. रिझर्व्ह बँकेने 2019 या आर्थिव वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार अनिवासी भारतीयांचे सुमारे 130.4 अब्ज डॉलर रुपये बँक खात्यात जमा आहेत. त्यामधील 94 अब्ज डॉलरची गुंतवणूक यावर्षी मॅच्युअर होणार आहे. अर्थजगतातील विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार हा आकडा सकृतदर्शनी धोक्याचा इशारा देणारा वाटतो. मात्र यापैकी 90 टक्के रक्कम पुन्हा गुंतवली जाते.
एनआरआयची भारतात आहे तब्बल 94 अब्ज डॉलरची गुंतवणूक, काढून घेतल्यास रुपया कोलमडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 16:53 IST