Join us
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाचा आंबा बागेवर परिणाम, अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे कराल, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 16:25 IST

Mango Farm : दर्जेदार उत्पादन आणि झाडाच्या जोमदार वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

Mango Farm :    आंबा बागेचे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे झाडाचे वय, हंगाम आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. दर्जेदार उत्पादन आणि झाडाच्या जोमदार वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सध्या वातावरणात बदल झाल्याने या काळात विशेष व्यवस्थापन करावे लागते. 

हवामान बदलाच्या काळात अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • हवामान बदलाला आंबा अत्यंत संवेदनशील आहे. 
  • तापमान, आर्द्रता, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस किंवा वाऱ्यांतील बदलांमुळे फुलोरा, फलन व फळगळ यावर थेट परिणाम होतो.
  • ताणाच्या अवस्थेत अन्नद्रव्य वहन व प्रकाश संश्लेषण कमी होऊन फुलांची तसेच फळांची गळ होते.
  • पालाश अन्नद्रव्य ताण सहन करण्यासाठी महत्त्वाचे आहे. 
  • यामुळे फूल, फळ टिकते. बोरॉनमुळे पेशीभिंती मजबूत करून ताणातही फलनास मदत होते. 
  • मॅग्नेशियममुळे ऊर्जा निर्मिती टिकते. जस्त, तांबे व मॅगनीज एन्झाईम क्रियांना चालना देते.
  • ढगाळ हवामानात पालाश आणि मॅग्नेशिअम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची पानांवरील फवारणी उपयुक्त ठरते.
  • झाडाची मुळे नीट काम करत नसतील तर जमिनीतून पोषण उशिराने मिळते. 
  • ताणाच्या काळात फवारणीद्वारे पोषण हा सर्वात जलद व सुरक्षित पर्याय ठरतो.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Climate Change Impacts Mango Orchards: Nutrient Management Strategies Detailed

Web Summary : Climate change severely affects mangoes. Manage nutrients like potash, boron, magnesium during stress. Foliar sprays of micronutrients are beneficial in cloudy weather for fruit retention and health. Root health is crucial for nutrient absorption.
टॅग्स :आंबापीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेती