Harbhara Crop : महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामधील (Rabbi Season) हरभरा हे पीक महत्वाचे दाळवर्गीय पिक आहे. बहुउपयोगीतेमुळे व दाळवर्गीय पिकामध्ये सर्वात जास्त उत्पादकता असल्या कारणाने हरभरा हे महाराष्ट्रातील महत्वाचे पिक म्हणून गणले जाते.
इतर कडधान्याच्या तुलनेत हरभऱ्यावर फार कमी कीड (Harbhara Crop Disease) आढळतात, कारण हरभरा हे पिक थंड हवामानात घेतले जाते. अशा स्थितीत जिरायती हरभरा पिकासाठी सामान्य सल्ला देण्यात आला आहे. विद्राव्य खताची फवारणीफुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. म्हणून पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के पुरियाची (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया) पहिली फवारणी आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
घाटे अळी
- ही कीड हरभऱ्याव्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफुल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.
- पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत, जमिनीची खोल नांगरट करावी.
- एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठया प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो.
- पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५-२० मीटर अंतरावर काठया रोवाव्यात किंवा मचान बांधावीत. म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळया पकडून खातात.
- हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी.
- पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूजन्य कीटकनाशक ५०० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे.
- किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, क्लोर अँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मि.ली. किंवा फ्ल्युबेन्डॅमाईड (४८ एससी) ०.२५ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी