Dhulaperani : यंदा मृग नक्षत्राच्या (Mrig Nakshatra) मुहूर्तावर कपाशीच्या धूळ पेरणीला प्रारंभ झाला आहे. रोहिणी नक्षत्रात पेरणीपूर्व मशागत करून शेतकऱ्यांनी धूळ पेरणीला सुरुवात केल्याचे चित्र काही गावात शेतशिवारात दिसून येत आहे.
काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा तर काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने पिकांची लागवड करीत आहेत. कपाशीच्या लागवडीला सुरुवात होताच शेतशिवार आबालवृद्धांनी फुलून गेल्याचे दिसत आहे.
दरवर्षी पिकांच्या भरभराटीचं स्वप्न उराशी बाळगून बळीराजा खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात करतात. यंदा रोहिणी नक्षत्रात वळवाचा पाऊस पडला.
परिणामी काही काळ शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली होती. मात्र, जून महिना प्रारंभ होताच वळवाच्या पावसाने उसंत घेतली. त्यामुळे शेतमशागतीस वेग आला अन् पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीची कामे करणे अत्यंत सोयीचे झाले.
पावसामुळे लागवडीखालील शेतात उगवलेल्या तणाची मशागतीमुळे विल्हेवाट लावणे सोयीचे झाले. यामुळे शेतकऱ्यांचा तण व्यवस्थापनावरील खर्च कमी झाल्याचे बोलले जाते.
यंदा रोहिणी नक्षत्रात वळवाचा पाऊस पडला. परिणामी काही काळ शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली होती.
पावसाच्या पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत ट्रॅक्टरद्वारे बेड पद्धतीने कपाशीची लागवड केली जात आहेत. यामुळे शेतात साठवलेल्या अतिपावसातही पिकांचे रक्षण होते. पाण्याचा निचरा होणाऱ्या शेतात पारंपरिक पद्धतीने पिकांची लागवड होत असल्याचे दिसून येत आहे.
आता १३ जुनपासून मृगाच्या पावसाला सुरूवात
हवामान अंदाजानुसार, १३ जूनपासून मृगाच्या पावसाला सुरुवात होण्याचे चित्र उभे असल्याने जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात कपाशीच्या धूळ पेरणीला वेग येणार आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीन, तूर आदी पिकांच्या पेरणीची लगबग सुरू होणार असल्याचे शेतकरी सांगतात.
कपाशीची धूळपेरणी म्हणजे एक प्रकारचा सट्टाच
कपाशीची धूळपेरणी हा एक प्रकारचा सट्टाच असल्याचे शेतकरी सांगतात. कारण कमी प्रमाणात पाऊस पडून नंतर पावसाने ओढ घेतली तर बियाणे कोंब घेऊन सुकतात. त्यामुळे पेरणी वाया जाते आणि पेरणीच्या वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडला तर पिकांची भरभराट येते. उत्पन्नात वाढ होते. म्हणून बहुतांश शेतकरी कपाशीच्या धूळ पेरणीला पसंती देतात.
धूळपेरणी म्हणजे काय?
धूळपेरणी म्हणजे पाऊस येण्याआधी, जमिनीतील ओलावा कमी असताना, किंवा पाऊस नसेल अशा स्थितीत पेरणी करणे. याला 'धुळपेरणी' असे म्हणतात, कारण यात बियाणे थेट कोरड्या जमिनीवर टाकले जाते. यात पेरणीनंतर लगेच पाऊस येणे आवश्यक असते, जेणेकरून बियाणे उगवेल.
कपाशीची धूळपेरणी
कपाशीच्या धूळपेरणी म्हणजे कपाशीच्या बियाणे थेट मातीत पाडून पेरणी करणे, जसे की धूळ उडवून. या पद्धतीत बियाणे मातीत जास्त प्रमाणात मिसळून जातात आणि त्यातून उगवण चांगली होते.
कपाशीच्या धुळपेरणीचे फायदे
वेळ आणि खर्च बचत : पारंपरिक पेरणीच्या तुलनेत धूळपेरणी कमी वेळेत आणि कमी खर्चात करता येते.
उत्पादन वाढ : योग्य पद्धतीने धूळपेरणी केल्यास कपाशीचे उत्पादन वाढू शकते.
श्रम कमी : या पद्धतीत कमी श्रम लागतात.
कपाशीच्या धूळपेरणीचे तोटे
बियाणे वाया जाण्याची शक्यता : धूळपेरणीमुळे बियाणे मातीत व्यवस्थित मिसळले जात नाही, त्यामुळे काही बियाणे वाया जाऊ शकतात.
कीड आणि रोगांचा धोका : धुळपेरणीमुळे कीड आणि रोगांचा धोका वाढू शकतो.
योग्य नाही : सर्व प्रकारच्या जमिनी आणि हवामानासाठी धूळपेरणी योग्य नसते.
धूळपेरणी करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
बियाणे निवड : योग्य प्रतीचे आणि चांगल्या प्रतीचे कपाशीचे बियाणे निवडावे.
जमीन: मध्यम ते भारी जमिनीसाठी धूळपेरणी योग्य असते.
पाणी : पेरणीनंतर योग्य प्रमाणात पाणी द्यावे.
कीड आणि रोग व्यवस्थापन : पेरणीनंतर नियमितपणे कीड आणि रोगांचे व्यवस्थापन करावे.
कपाशीच्या धूळपेरणीमुळे वेळ, खर्च आणि श्रम वाचतात. मात्र योग्य पद्धतीने पेरणी करणे आवश्यक आहे. योग्य बियाणे, जमीन आणि व्यवस्थापन केल्यास धूळपेरणी कपाशीचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.