Join us

माती व पिकांसाठी अमृत असणारं हे जीवाणू खत कसे बनवाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:16 AM

जीवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते. त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाखीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.

जीवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते. त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाखीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.

जीवामृत निर्मिती व वापर

साहित्य■ २०० लिटर क्षमतेचे प्लॅस्टिक बॅरल किंवा सिमेंटची टाकी.■ १० किलो देशी गायीचे ताजे शेण.■ १० लिटर देशी गायीचे गोमूत्र.■ २ किलो काळा गावरान गूळ.■ २ किलो कोणत्याही कडधान्याचे पीठ (बेसन).■ २ किलो वडाच्या झाडाखालची किंवा बांधावरील (शेतातील) जिवाणू माती (गाळ).■ उपलब्ध असल्यास १०० ग्रॅम रायझोवीयम, पीएसवी यासारखी जिवाणू संवर्धके.

कृती■ जीवामृत तयार करण्यासाठी २०० लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरल किंवा सिमेंट टाकीमध्ये १७० लिटर स्वच्छ पाणी घ्यावे.■ त्यात १० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, २ किलो काळा गूळ, २ किलो बेसन, २ किलो जिवाणू माती किंवा १०० ग्रॅम उपलब्ध जिवाणू संवर्धक मिसळावी.■ डावीकडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे.

वापर कसा करावा?■ ७ दिवसांत पिकांना देण्यासाठी जिवामृत तयार होते.■ एका एकराला २०० लिटर जीवामृत पुरेसे होते. जास्त क्षेत्र असल्यास बॅरलची संख्या वाढवावी.■ गोमूत्राची उपलब्धता जास्त असल्यास पाण्याचे प्रमाण कमी करावे.■ शेतकरी जीवामृत तयार करण्यासाठी विविध प्रमाणात साहित्य वापरतात ते द्रावण ठेवण्याचे दिवसही वेगवेगळे आहेत. मात्र, वरील साहित्य किमान व योग्य प्रमाणात आहेत.■ जीवामृत ३० दिवसांच्या आत वापरावे.

जीवामृताचे फायदे■ जीवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते. त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते.■ पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाखीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.■ जीवामृताचा वापर केलेल्या शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.■ शेती पद्धतीत सेंद्रीय घटकांचा वापर वाढवल्यावर जिवाणूंना खाद्य उपलब्ध होते. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.■ सेंद्रीय पदार्थांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात.■ जीवामृताच्या वापरामुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते.

अधिक वाचा: या सात धान्यांपासून तयार करा अशी स्लरी, जी ठेवेल मातीची तब्येत बरी

टॅग्स :शेतकरीसेंद्रिय खतसेंद्रिय शेतीपीकपीक व्यवस्थापनखते