Shetmal Bajar Bhav : शेतकऱ्यांजवळील शेतमाल (Shetmal) संपल्यानंतर सोयाबीन, हरभऱ्याच्या (Soybean, Harbhara) दरात चमक आलेली आहे. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
अमरावती जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी अडचणींमुळे यापूर्वीच शेतमालाची(Shetmal) विक्री केल्याने त्यांचे नुकसान झाले. आता झालेली दरवाढ व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
अलीकडच्या तीन वर्षात सोयाबीनचे (Soybean) सरासरी उत्पन्न घटले. त्यामुळे मागणी वाढून दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. ९० टक्के शेतकऱ्यांनी शेतमाल यापूर्वीच विकला आहे. त्यामुळे या दरवाढीचा फारसा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.
हंगामात पहिल्यांदा हरभरा 'एमएसपी'पार
यावर्षी हरभऱ्याचा हमीभाव ५,६५० रुपये क्विंटल असताना मार्केटमध्ये ५,३०० रुपयांवर दर स्थिरावले होते. या चार दिवसांत मागणी वाढल्याने हरभऱ्याचे दर ५,८०० ते ६ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा असल्याने अनेक शेतकरी हरभऱ्याची साठवणूक करीत आहेत. (MSP)
शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा
खरीप पेरणीच्या तोंडावर मे व जूनमध्ये तसेच रब्बी पेरणीपूर्वी म्हणजेच दिवाळीच्या कालावधीत दरवाढ होण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकरी हरभऱ्याची साठवणूक करीत आहेत. शासन हमीभाव केंद्रांपेक्षा (नाफेड) जास्त दर असल्याने हरभऱ्याची नोंदणीदेखील अत्यल्प आहे.
उन्हाळ्यात काही प्रमाणात दरवाढ झालेली आहे. स्थानिक बाजारात मागणी वाढल्याचा हा परिणाम आहे. जास्त दरवाढीची यंदा शक्यता नाही. - संजय राठी, व्यापारी
सोयाबीनचे बाजारभाव (रु./क्विं.)
२६ मार्च | ३८५० ते ४१४७ |
२८ मार्च | ४०५० ते ४२०० |
०२ एप्रिल | ४२५० ते ४४०० |
०४ एप्रिल | ४२५० ते ४३७० |
०७ एप्रिल | ४००० ते ४१५० |
०८ एप्रिल | ४०५० ते ४२२५ |