Soybean Market Update : राज्यात अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढू लागली असली तरी दर मात्र घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Soybean Market Update)
हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाचे अनियमित आगमन, रोगराई आणि अतिवृष्टीमुळे पीक मोठ्या प्रमाणात बाधित झाले. अशा परिस्थितीत मिळालेला शेतमालही जास्त ओलसर असल्याने व्यापारी दरकपात करून खरेदी करत आहेत. (Soybean Market Update)
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
खामगाव बाजार समितीत काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा दर फक्त ३ हजार २०० रुपये प्रति क्विंटल मिळाला.
दुसऱ्यांना थोडा जास्त म्हणजे ३ हजार ५०० रुपये दर मिळाला.
तर जुन्या, कोरड्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ४०० पर्यंत दर मिळत आहे.
परंतु, शेतकऱ्यांची खरी अपेक्षा असलेला हमीदर ५ हजार ३२८ रुपयांपर्यंत दर मात्र कुठेच दिसून येत नाही.
दर घसरण्यामागची प्रमुख कारणे
जुना साठा बाजारात
गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या आशेने सोयाबीन घरात साठवून ठेवला होता. आता नवीन हंगामातील आवकाशी जुना साठाही बाजारात येत असल्याने दरांवर ताण पडला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव
प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांत विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या भावात घसरण झाली असून त्याचा थेट परिणाम भारतातील बाजारावर दिसून येतो आहे.
आयात धोरण
सरकारने खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आयात शुल्क कमी केले आहे. यामुळे परदेशातून पाम तेल व सोयाबीन तेल मोठ्या प्रमाणात येऊ लागले असून देशांतर्गत सोयाबीनला मागणी कमी झाली आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष प्रमुख बाजारांकडे
राज्यातील सोयाबीनची सर्वाधिक आवक लातूर, वाशिम, अकोला, दर्यापूर आणि खामगाव बाजार समित्यांमध्ये होत आहे. या ठिकाणी मिळणारे दरच राज्यभरातील भावाचे दिशानिर्देशक ठरतात. सध्या मात्र सर्वत्र दर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
पावसामुळे उत्पादन घटले, आणि जे थोडेफार पीक वाचले ते विक्रीसाठी आणल्यावर दर मात्र पडले. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात अडकले आहेत. सणासुदीच्या काळात काहीसा दिलासा मिळेल या आशेने सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले, पण अपेक्षेप्रमाणे दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
Web Summary : Maharashtra's soybean farmers face crisis as prices fall despite increased supply. Erratic rains, diseases, and imports contribute to low rates, far below expectations. Farmers are in distress due to reduced yields and low market prices.
Web Summary : महाराष्ट्र के सोयाबीन किसान संकट में हैं क्योंकि आपूर्ति बढ़ने के बावजूद कीमतें गिर रही हैं। अनियमित बारिश, बीमारियों और आयात से कीमतें कम हैं, जो अपेक्षा से बहुत कम हैं। कम उपज और कम बाजार मूल्यों के कारण किसान परेशान हैं।