Kapus Bajar Bhav : केंद्र सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क पूर्णपणे काढून टाकले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कापसाला समाधानकारक भाव मिळणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे परदेशी कापसाचा पुरवठा वाढेल आणि देशांतर्गत शेतकऱ्यांवर दबाव येईल, असे कापूस उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याचा परिणाम अनेक बाजारामधील किमतींवर होऊ लागला आहे. २१ ऑगस्ट रोजी अनेक बाजारात किमती २,१०० रुपयांपासून ९,७१९ रुपयांपर्यंत नोंदल्या गेल्या, जे २० ऑगस्टपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत, देशभरातील विविध मंडईंमधील कापसाच्या ताज्या किमती जाणून घ्या...
२१ ऑगस्ट रोजी देशभरातील बाजारपेठेत कापसाचे भाव २ हजार १०० रुपये ते ९ हजार ७१९ रुपये प्रति क्विंटल होते. प्रमुख बाजारपेठांमधील किमती खालीलप्रमाणे होत्या...
- अदोनी (कुरनूल) – कमीत कमी ४ हजार ६६९ ते सरासरी ८ हजार २११ रुपये
- बाबरा (अमरेली) – कमीत कमी ७ हजार ९०० ते सरासरी ८ हजार रुपये
- चित्रदुर्ग – कमीत कमी २ हजार १०० ते सरासरी ९ हजार ७१९ रुपये
- ध्रंगध्र (सुरेंद्रनगर) – ६ हजार ४९० ते ८ हजार ५०० रुपये
- राजकोट – कमीत कमी ६ हजार ५०० ते सरासरी ८ हजार १९५ रुपये
- सावरकुंडला (अमरेली) – कमीत कमी ६ हजार ते सरासरी ७ हजार ८५५ रुपये
या किमतींऐवजी, २० ऑगस्ट रोजी बाजारपेठांमधील किमती ४ हजार ९१० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. म्हणजेच, अनेक ठिकाणी एका दिवसात १५०० रुपयांपर्यंतची घसरण दिसून आली आहे.