प्रशांत तेलवाडकर
डाळींच्या दरात अचानक झालेली घसरण आणि केंद्र सरकारने उचललेले आयातीचे (Import Policy) पाऊल यामुळे देशभरात बाजारात खळबळ उडाली आहे.दरम्यान एमएसपीपेक्षा (MSP) खाली गेलेल्या दरांमुळे शेतकरीही चिंतेत आहेत, आणि खरीप हंगामातील पेरणीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Dal Market)
ग्राहकांना स्वस्त दरात डाळी मिळत असल्या तरी साठेबाज आणि शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. मार्च-एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात डाळी साठवलेल्या व्यापाऱ्यांना अवघ्या २० दिवसांत तब्बल ७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात रंगली आहे. (Dal Market)
डाळींच्या दरवाढीचा अंदाज बांधत अनेक व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवलेला असतानाच केंद्र सरकारने आयातीसाठी (Import Policy) उघड केलेल्या दरवाज्यांमुळे साठेबाजांची गणिते कोलमडली आहेत. (Dal Market)
परिणामी, अवघ्या २० दिवसांत डाळींच्या दरात प्रति क्विंटल ३०० ते ७०० रुपयांपर्यंत घट झाली असून, जिल्ह्यातील साठेबाजांना जवळपास ६० ते ७० कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
मार्च-एप्रिलमध्ये साठेबाजांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी
दरवाढीच्या शक्यतेचा अंदाज घेत मार्च ते एप्रिलमध्ये तूर, हरभरा, मूग, मठ आणि मसूर डाळी व्यापाऱ्यांनी भरमसाठ प्रमाणात खरेदी केल्या होत्या.
तूर डाळ – १०,२०० ते १०,५००
हरभरा डाळ – ७,३०० ते ७,५००
मूग डाळ – ९,८०० ते १०,०००
मठ डाळ – ८,००० ते ८,२००
मसूर डाळ – ७,८०० ते ८,०००
साठेबाजांचा अंदाज होता की, सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणाअंतर्गत भाववाढीस पाठिंबा देईल. मात्र, सरकारने उलट धोरण राबवत आयातीला प्रोत्साहन दिल्याने बाजारात दर कोसळले.
२० दिवसांत डाळींच्या दरात मोठी घट
डाळीचा प्रकार | सध्याचा दर (₹/क्विं.) | दरातील घट |
उडीद डाळ | ९००० - ९५०० | ५०० |
चणा डाळ | ६९००-७००० | ३०० |
तूर डाळ | ९२०० - ९६०० | ७०० |
मूग डाळ | ९३०० - ९७०० | ६०० |
मठ डाळ | ७५०० - ७८०० | ३०० |
मसूर डाळ | ७३००-७७०० | ३०० |
आयातीत माल अधिक स्वस्त; MSP पेक्षा दर खाली
डाळींच्या स्थानिक दरांनी आता किमान आधारभूत किंमती (MSP) खाली घसरले आहेत. त्यातच आयातीत माल स्वस्त असल्याने देशांतर्गत उत्पादनावर दबाव वाढला आहे.
मुगाची MSP : ८,७६९ , तर म्यानमारहून आयात खर्च : ६,७००
तुरीची MSP : ८,०००, तर आयात खर्च : ५,५00 ते ६,५००
हरभरा डाळीऐवजी स्वस्त पिवळा वाटाणा
हरभऱ्याच्या दरात झालेल्या घटीनंतर आता ग्राहक स्वस्त पर्याय म्हणून ऑस्ट्रेलिया व इथिओपियामधून आयात होणारा पिवळा वाटाणा वापरत आहेत. त्यामुळे हरभऱ्याचा वापर घटला आणि त्याचा परिणाम अन्य डाळींवरही झाला.
शेतकरी चिंतेत, खरीप पेरणीवर परिणाम शक्य
डाळींच्या गडगडलेल्या दराचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या निर्णयावर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरीप हंगामात मुगसारख्या डाळींच्या पेरणीत घट होण्याची चिन्हे आहेत, कारण सध्याचे दर MSP पेक्षा कमी असून उत्पादनात तोटा होण्याची भीती आहे.
शेतकऱ्यांना अनिश्चितता
सरकारच्या आयात धोरणामुळे ग्राहकांना सध्या डाळी स्वस्त दरात मिळत आहेत, मात्र, हे चित्र शेतकऱ्यांसाठी धोक्याचे आणि व्यापाऱ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. बाजारात निर्माण झालेल्या असंतुलनामुळे शेती अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत मोठी घट; जाणून घ्या आजचा बाजारभाव