राज्यात सध्या मोबाइलद्वारे सुरू असलेल्या ई पीक पाहणीची मुदत १५ ऑक्टोबर असून डिजिटल क्रॉप सर्वेनुसार सुरू असलेल्या राज्यातील ११४ गावांमधील प्रायोगिक तत्त्वावरील ई-पीक पाहण्याची मुदत मात्र, दहा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. ही मुदत आता २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. नियमित ई-पीक पाहणीची मुदत तीच असल्याने शेतकऱ्यांनी या वेळेत पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५७ लाख ६ हजार ४९४ खातेदारांनी ७९ लाख २५ हजार ४९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नोंदणी केली आहे.
कुठे होणार दोन वेळा ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे या मोबाइल अॅपवरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे व नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सर्व गावे अशा ११४ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावरील ई-पीक पाहणी केली जात आहे. या ११४ गावांमध्ये दोन वेळा ई-पीक पाहणी होणार आहे.
खरीप हंगामातील नोंद झालेली प्रथम पाच पिके- सोयाबीन: २९ लाख १४ हजार २१६ हेक्टर- कापूस: १५ लाख ६७ हजार ८०१ हेक्टर- भात: ७ लाख ६६ हजार ४९ हेक्टर- तूर: ३ लाख ३६ हजार ८७५ हेक्टर- मका: ३ लाख १८ हजार ११६ हेक्टर
१५ सप्टेंबरअखेर ई-पीक पाहणीची स्थिती- पीक पाहणी खातेदार संख्या: ५७ लाख ६ हजार ४९४- क्षेत्र: ७९ लाख २५ हजार ४९२ हेक्टर