अविनाश पाईकराव
एकेकाळी शेतकऱ्याच्या खांद्यावरची ताकद असलेली लाकडी शेती अवजारे… आज काळाच्या ओघात इतिहासजमा होत आहेत. आधुनिक यंत्रांच्या गर्दीत नांगर, तिफण, पाभर, कोळपे या परंपरागत साधनांची जागा आता यांत्रिकी अवजारांनी घेतली आहे. ही केवळ तांत्रिक नाही, तर सांस्कृतिक बदलाची कहाणी आहे.(Wooden Farming Tools)
काळानुसार शेतीत बदल घडत गेलेत, पण काही बदलांनी शेतकऱ्याच्या पारंपरिक जीवनशैलीत मोठी दरी निर्माण केली आहे. एकेकाळी शेतकऱ्याच्या ओसरीपासून बैलजोडीच्या अंगावर झुलणाऱ्या झोंबदार झोपाळ्यांपर्यंत सर्वत्र असणारी लाकडी शेतीची अवजारे आता इतिहासजमा होऊ लागली आहेत. (Wooden Farming Tools)नांगर, तिफण, पाभर, आळवट, कोळपे, खुरपे, कुदळ, बैलगाड्या ही शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने ओळख होती. पण आजच्या यंत्रयुगात ती दुर्मिळ होऊ लागली आहेत.(Wooden Farming Tools)पारंपरिक शेतीत लाकडी अवजारांचे महत्त्व* एकेकाळी शेतकऱ्यांची संपूर्ण शेती लाकडी अवजारांवरच अवलंबून होती.* नांगर, तिफण, वखर, पाभर यांसारखी अवजारे शेतजमीन नांगरण्यासाठी वापरली जात.* कोळपे, आळवट, रुमणे, तखर, कुदळ आदी हाताळणीसाठी उपयुक्त होती.* बैलाच्या साहाय्याने चालणारी ही अवजारे पर्यावरणपूरक, कमी खर्चिक आणि स्थानिक कारागिरांनी तयार केलेली असायची.* प्रत्येक गावात सुतार व लोहारांची एक परंपरा होती. जी शेतीला उपयुक्त साधने बनवायची आणि वेळोवेळी त्यांची दुरुस्ती करायची.आता शेती झाली यांत्रिक, लाकूड झालं बाजूलावेळ, मजुरी, कामगारांची कमतरता आणि शेतीत उच्च उत्पादनासाठी लागणाऱ्या वेळेची मर्यादा लक्षात घेता, शेतकरी आता ट्रॅक्टर, कल्टिव्हेटर, पेरणी यंत्र, कंबाइन हार्वेस्टरसारख्या यंत्रांकडे वळले आहेत.लाकडी अवजारांची जागा आता लोखंडी व अत्याधुनिक यंत्रांनी घेतली आहे.या बदलामुळे शेती जरी जलद आणि यांत्रिक झाली असली, तरी पारंपरिक ज्ञान आणि कौशल्य लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.लुप्त होण्यामागची कारणे* वाढती मजुरी : पूर्वी कारागीर कमी पैशात अवजारे बनवायचे. आता ते परवडत नाहीत.* सुतार आणि लोहार यांचा तुटवडा : नवी पिढी हे कौशल्य आत्मसात करत नाही.* यांत्रिकीकरणाचा प्रभाव : आधुनिक साधनांनी श्रम, वेळ आणि मनुष्यबळ कमी केले आहे.* परंपरेची तोड : लाकडी अवजारे बनवण्याचा वारसा पुढील पिढीत पोहोचत नाही.* लाकडी अवजारे : शेतकऱ्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भागपूर्वी शेती म्हणजे केवळ उत्पादन नव्हे तर संस्कृती होती. घरात ठेवलेली खुरपी, बैलजोडीचा नांगर, तखर, खल उखळ ही केवळ कामाची साधने नव्हती. ती एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारी परंपरा होती.इतिहास म्हणून का होईना, पण लक्षात राहावे!आज यंत्रांच्या साहाय्याने जरी शेती प्रगत झाली असली, तरी पारंपरिक लाकडी साधनांनी केलेली शेती प्राकृतिक, आत्मनिर्भर आणि पर्यावरणाशी सुसंगत होती.या साधनांची नव्या पिढीत जपणूक व्हावी, त्यांना संग्रहालयात नव्हे तर सजीव इतिहास म्हणून जिवंत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे.हे ही वाचा सविस्तर : Solar Village: गावांची सौर स्पर्धा सुरू; तुम्ही निवडलेल्या गावात आहे का? वाचा सविस्तर