Agriculture News : कृषि उत्पादन व उत्पादकता वाढविण्यामध्ये दर्जेदार कृषि निविष्ठांची वेळेवर उपलब्धता होणे आवश्यक आहे. दर्जेदार कृषि निविष्ठांना अनन्यसाधारण महत्व आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध होत असलेल्या बियाणे, खते, किटकनाशके इत्यादी निविष्ठा निकृष्ठ दर्जाच्या असणे, त्यामध्ये भेसळ असणे.
अथवा त्या योग्य दर्जाच्या नसल्याबाबत शेतकऱ्यांकडून अथवा अन्य व्यक्ती, संस्था यांच्याकडून तक्रारी प्राप्त होत असतात. अशा सर्व तक्रारीची गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. निविष्ठा विषयक बहुतांश तक्रारी या तालुका स्तरावर प्राप्त होत असतात.
तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची खालीलप्रमाणे फेररचना करण्यात येत आहे.
समिती सदस्य | पदनाम |
---|---|
संबंधित उप विभागाचे उप विभागीय कृषि अधिकारी | अध्यक्ष |
संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी | सदस्य |
कृषी विद्यापीठ / कृषी संशोधन केंद्र / कृषी विज्ञान केंद्र प्रतिनिधी | सदस्य |
महाबीज प्रतिनिधी | सदस्य |
कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय | सदस्य सचिव |
अशी असेल कार्यपद्धती
सदर समितीने निविष्ठा विषयक तक्रारी प्राप्त होताच ८ दिवसांच्या आत त्यांची तपासणी करावी.
तक्रार प्राप्त निविष्ठा ज्या कंपनीकडून दिलेली आहे, अशा कंपनीच्या प्रतिनिधी व विक्रेते यांना सदर तपासणी दौऱ्याच्या वेळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तपासणीसाठी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींची आणि तक्रारकर्त्या शेतकऱ्यांची साक्ष घेणे बंधनकारक राहील.
शेतकऱ्यांकडे निविष्ठा खरेदीच्या पावत्या उपलब्ध आहेत, याची खात्री करावी. विहित प्रपत्रातच पंचनामा करण्यात यावा व तात्काळ पंचनामाची प्रत शेतकरी तसेच कंपनी प्रतिनिधी यांना देण्यात यावी. तक्रार असलेल्या बियाण्यांच्या लॉटचा नमुना घेऊन अधिसूचित प्रयोगशाळेकडून त्याची तपासणी करून घ्यावी.
संदर्भ क्रमांक ३ अन्वये कार्यरत असलेली तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती संदर्भ क्रमांक ४ ची अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांक पासून अस्तित्वात राहणार नसल्याने त्यांचेकडे यापूर्वी आलेल्या निविष्ठा विषयक तक्रारी संबंधित तालुक्यांकडे वर्ग करण्यात याव्या.