Join us

Smart Project : शेतकरी कंपन्या झाल्या 'हायटेक'; आता शेतीही डिजिटल, योजनाही स्मार्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:16 IST

Smart Project : शेतकरी आता पारंपरिक पिकांपलीकडे जाऊन आधुनिक शेती प्रकल्प उभारत आहेत. मा. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यातील २१ प्रकल्प प्रगतिपथावर आहेत, तर ४ पूर्ण झाले आहेत. कोल्ड स्टोरेज, डाळ मिल, गोडाऊनसारख्या सुविधा शेतकऱ्यांना नवे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देत आहेत. तब्बल २४ कोटी रुपये अनुदान मंजूर झाल्याने जिल्ह्यात ग्रामीण अर्थक्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.(Smart Project)

शिरीष शिंदे

शेतकरी आता पारंपरिक पिकांपलीकडे जाऊन आधुनिक शेती प्रकल्प उभारत आहेत. मा. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यातील २१ प्रकल्प प्रगतिपथावर आहेत, तर ४ पूर्ण झाले आहेत.(Smart Project)

कोल्ड स्टोरेज, डाळ मिल, गोडाऊनसारख्या सुविधा शेतकऱ्यांना नवे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देत आहेत. तब्बल २४ कोटी रुपये अनुदान मंजूर झाल्याने जिल्ह्यात ग्रामीण अर्थक्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.(Smart Project)

परंपरागत शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत, आता शेतकरी स्वतःच्या कंपन्यांद्वारे (Farmer Companies) आधुनिक शेती व्यवसायाकडे वळत आहेत. मा. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यात सुरू झालेल्या उपक्रमाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची दिशा दिली आहे. या प्रकल्पांतर्गत तब्बल २१ प्रकल्प प्रगतिपथावर, तर ४ प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत.(Smart Project)

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवला जाणारा हा प्रकल्प कृषी आणि ग्रामीण भागात अर्थक्रांती घडवणारा ठरत आहे.(Smart Project)

स्मार्ट प्रकल्प म्हणजे काय?

मा. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे.

* पारंपरिक शेतीव्यवस्थेचे आधुनिकीकरण

* शेतमालाचे योग्य मूल्य मिळवण्यासाठी मूल्यसाखळीचे निर्माण

* शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचतगट, पतसंस्था यांना व्यवसायाभिमुख करणे

* साठवणूक, प्रक्रिया, शीतसाखळी व बाजार व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारणे

२१ कंपन्यांना २४ कोटींचे अनुदान

२०२५-२६ या वर्षासाठी बीड जिल्ह्याला एकूण ३८ प्रकल्पांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी २९ प्रकल्पांना प्राथमिक मान्यता मिळाली असून, २१ कंपन्यांना २४ कोटी ४० लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदान, ३० टक्के बँक कर्ज, आणि १० टक्के स्व-भांडवल गुंतवावे लागते.

कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत?

ग्रामीण भागात शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे पुढील अत्याधुनिक सुविधा उभ्या केल्या जात आहेत.

* गोडाऊन (Warehouses)

* धान्य प्रतवारी गृह

* डाळ मिल

* कोल्ड स्टोरेज

* ब्लास्ट फ्रीझर

हे प्रकल्प शेतमाल साठवणूक, प्रक्रिया व विक्री सुलभ करतील.

लाभ कोणाला मिळेल?

* या योजनेचा लाभ या संस्थांना मिळू शकतो

* शेतकरी उत्पादक कंपन्या

* आत्मा योजनेतील नोंदणीकृत शेतकरी गट

* महिला बचतगटांचे प्रभाग संघ

* महिला आर्थिक विकास महामंडळाचे लोक संचालित साधन केंद्र

* प्राथमिक कृषी पतसंस्था

* उत्पादक संघ

या प्रकल्पाचे फायदे काय?

* शेतकऱ्यांचे थेट प्रकल्पांमध्ये सहभाग

* कमी भांडवलात मोठे उत्पन्न

* साठवणूक व विक्री सुलभ

* रोजगार निर्मितीची संधी

*महिलांनाही आर्थिक स्वावलंबनाची दिशा

स्मार्ट प्रकल्पामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. २१ प्रकल्प प्रगतिपथावर असून, यामुळे शेतमालाला बाजारपेठ मिळत आहे, रोजगार निर्माण होत आहे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होतो आहे. - सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड

हे ही वाचा सविस्तर :Farmer Success Story: 'लंडन रिटर्न' तरुण शेतकऱ्याचा खजुर शेतीत धमाका; थेट ४० लाखांचं उत्पन्न! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबीड