Join us

Kharif Crop Damage : खरीप हंगामावर पावसाचा घाला; 'या' जिल्ह्याची आणेवारी फक्त ४७.८२ टक्के वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:37 IST

Kharif Crop Damage : यंदाचा खरीप हंगाम अतिवृष्टीच्या तडाख्याने अक्षरशः कोसळला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी आणेवारी फक्त ४७.८२ टक्के इतकी नोंदवली गेली असून, एकाही गावाची आणेवारी ५० टक्क्यांच्या वर नाही. ५२.१६ टक्क्यांनी घटलेल्या आणेवारीतून पिकांचं प्रचंड नुकसान स्पष्ट दिसत आहे. (Kharif Crop Damage)

Kharif Crop Damage : यंदाचा खरीप हंगाम अतिवृष्टीच्या तडाख्याने अक्षरशः कोसळला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी आणेवारी फक्त ४७.८२ टक्के इतकी नोंदवली गेली असून, एकाही गावाची आणेवारी ५० टक्क्यांच्या वर नाही. (Kharif Crop Damage)

५२.१६ टक्क्यांनी घटलेल्या आणेवारीतून पिकांचं प्रचंड नुकसान स्पष्ट दिसत आहे. ७ लाख ४९ हजार हेक्टरवर झालेल्या पिकपेरणीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न जवळपास हातातून गेल्याने कृषी क्षेत्रात निराशा पसरली आहे. आता शासनाकडून दुष्काळ जाहीर होऊन मदत मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.(Kharif Crop Damage)

या वर्षीचा खरीप हंगाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अक्षरशः विनाशकारी ठरला आहे. पावसाने सुरुवातीपासूनच अवेळी आणि अतिवृष्टीचा खेळ केला. परिणामी पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.(Kharif Crop Damage)

जिल्ह्याच्या खरीप हंगामाची सुधारित आणेवारी (पैसेवारी) ४७.८२ टक्के एवढी नोंदवली गेली असून, एकाही गावाची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नाही.(Kharif Crop Damage)

३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आलेल्या जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, खरीप हंगामातील नुकसान स्पष्ट दिसत आहे. ५२.१६ टक्क्यांनी आणेवारी घसरली असून, हा आकडा गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा घटक ठरला आहे.(Kharif Crop Damage)

खरीप पिकांवर अतिवृष्टीचा जबरदस्त परिणाम

या हंगामात जिल्ह्यात एकूण ७ लाख ४९ हजार ८०३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली होती. मात्र, जूनपासून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी, वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी पिकं उखडली, कुजली किंवा पूर्णपणे नष्ट झाली. सोयाबीन, कपाशी, मका आणि तूर या प्रमुख पिकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकं घेतली होती, मात्र हवामानाच्या अनिश्चिततेमुळे उत्पादनात मोठी घट झाली. काही तालुक्यांमध्ये तर पिकांचं ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.

तालुकानिहाय आणेवारीचा तपशील (टक्केवारीत)

तालुकागावेआणेवारी (%)
छत्रपती संभाजीनगर शहर४०४८.१४
संभाजीनगर तालुका१५४४७.०२
पैठण१८९४६.११
फुलंब्री९२४९.००
वैजापूर१६४४३.७३
गंगापूर२२२४८.१५
खुलताबाद७६४८.००
सिल्लोड१३२४८.००
कन्नड२०१४८.००
सोयगाव८४४८.००
एकूण सरासरी१३५४४७.८२

आणेवारी कमी आल्याने शेतकऱ्यांवर संकट

५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी म्हणजे दुष्काळसदृश परिस्थिती. अशा भागांना शासन दुष्काळग्रस्त क्षेत्र घोषित करून विविध सवलती देऊ शकते.

आणेवारी कमी आल्यास मिळणाऱ्या सवलती

* दुष्काळग्रस्त क्षेत्र जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत व भरपाई मिळते.

* कर्जमाफीचा विचार होतो किंवा कर्जफेडीला मुदतवाढ मिळते.

* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळते.

* पिण्याचे व शेतीसाठीचे पाणी आणि वीजदर सवलती मिळतात.

* चारा छावण्या, बियाणे व खतसहाय्य यासारख्या उपाययोजना सुरु होऊ शकतात.

शेतकऱ्यांची भावना

आम्ही खरीपावर मोठी गुंतवणूक केली, पण सततच्या पावसामुळे पिकं उभीच कुजली. एकरी ५-६ हजार रुपये खर्च करूनही काहीच हाती लागलं नाही, असं गंगापूर तालुक्यातील शेतकरी सांगतात.

काही शेतकऱ्यांनी तर पुढील रब्बी हंगामासाठी बी-बियाणे खरेदीही थांबवली आहेत. शासनाकडून तातडीने मदत न मिळाल्यास ग्रामीण भागात आर्थिक संकट आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालावरून शासनाला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू आहे. कृषी व महसूल विभाग संयुक्तपणे नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत आहेत. पुढील काही दिवसांत याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर :Cotton Crop Damage : वेचणीस आलेल्या कापसाला पावसाचा शाप; उत्पादकांवर आले मोठे संकट

English
हिंदी सारांश
Web Title : Rain Devastates Kharif Crop Yield in Chhatrapati Sambhajinagar District

Web Summary : Heavy rainfall severely damaged Kharif crops in Chhatrapati Sambhajinagar. The crop yield (Anewari) is below 50% across all villages, impacting 749,803 hectares. Farmers may receive drought relief, including loan waivers and subsidies on education and utilities.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती