Pik Vima Yojana : राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, खरीप २०२५ हंगामासाठी (Kharif Season) RWBCIS अंतर्गत अधिसूचित केलेल्या पेरू, संत्री, लिंबू आणि द्राक्ष पिकांसाठी कर्जदार आणि कर्ज नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यास केंद्र सरकार मान्यता देण्यात आली आहे. वाढीव कालावधीत होणाऱ्या नोंदणींसाठी प्रीमियमचा गोल हिस्सा देखील देय असेल.
मृग बहारातील संत्रा (Orange Crop Insurance) या पिकाची १४ जूनला सहभाग मुदत संपलेली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राने शेतकरी सहभागासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत वाढवलेली आहे. तरी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना सुचित करण्यात येते की आपल्या जवळच्या बँक शाखा, सीएससी सेंटर (सेतू) वर जाऊन आपल्या शेतातील फळ पिकाचा विमा उतरून घ्यावा ही विनंती.
फळ पिकेसंत्रा (मृग बहार) : शेवटची तारीख ३० जुन २०२५मोसंबी (मृग बहार) : शेवटची तारीख ३० जुन २०२५प्रीमियम (रक्कम प्रती हेक्टरी)संत्रा - ५०००मोसंबी - ५०००
आवश्यक कागदपत्र
- १) सातबारा
- २) बँक खाते बुक
- ३) आधार कार्ड
- ४) स्वयं घोषणा पत्र
- ५) बागेचा फोटो
सन २०२५ पासून पिक विमा व फळपीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना Agri Stack नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. याशिवाय त्यांना सहभाग घेता येणार नाही. पिक आणि फळपीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना इ पिक पाहणीमध्ये नोंद अत्यावश्यक आहे. सर्व शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तारखेच्या आत विमा उतरून घ्यावा.