Drought Alert : खरीप हंगामाचा आढावा घेतल्यानंतर जिल्ह्यातील पिकांची नजरअंदाज पैसेवारी (आणेवारी) ४७.८४ टक्क्यांवर आली आहे. या अहवालामुळे जिल्हा ओल्या दुष्काळाच्या दिशेने वाटचाल करतोय, अशी गंभीर परिस्थिती समोर आली आहे. (Drought Alert)
ऑक्टोबर अखेर अंतिम अहवाल जाहीर होणार असून त्यानंतर खरीप हंगामाची वास्तविकता स्पष्ट होईल. (Drought Alert)
५० टक्क्यांखाली आणेवारी; दुष्काळाची चाहूल
संपूर्ण जिल्ह्यातील एकाही गावाची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा वर पोहोचलेली नाही.
गेल्या वर्षाच्या तुलनेत ५२.१४ टक्क्यांनी आणेवारी घटली आहे.
महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार, २ लाख ३७ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
जुलै अखेरपर्यंत १२ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते, मात्र, सप्टेंबरमधील १८ दिवसांत तब्बल २ लाख २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली.
पावसाचा तडाखा – उत्पादनाची वाट लागली
जिल्ह्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५८१ मि.मी. असतानाही यंदा १४१ टक्के पाऊस झाला.
अतिवृष्टीमुळे खरीप पिके पाण्याखाली गेली आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारखी प्रमुख पिके प्रभावित झाली.
तालुकानिहाय आणेवारी (पैसेवारी %)
संभाजीनगर शहर – ४८.१४%
संभाजीनगर तालुका – ४७.००%
पैठण – ४६.११%
फुलंब्री – ४९.००%
वैजापूर – ४८.०१%
गंगापूर – ४८.१५%
खुलताबाद – ४८.००%
सिल्लोड – ४८.००%
कन्नड – ४८.००%
सोयगाव – ४८.००%
एकूण सरासरी – ४७.८४%
आणेवारी कमी आल्यास काय होते?
* जर पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली, तर त्या भागात ओला किंवा कोरडा दुष्काळ घोषित होतो.
* शासनाकडून शेतकऱ्यांना मदत पॅकेज, कर्जमाफी, शुल्क सवलत, कर्जवसुली स्थगिती यांसारख्या सुविधा मिळू शकतात.
आणेवारी म्हणजे काय?
महसूल विभाग गावागावात खरीप व रब्बी पिकांची पाहणी करून पैसेवारी ठरवतो.
जमिनीची महसुली क्षमता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न कितपत घटले आहे, हे यावरून स्पष्ट होते.
५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी आली तर त्या गावाला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची प्रक्रिया सुरू होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सध्याची ४७.८४ टक्क्यांची आणेवारी ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. पावसाचा तडाखा आणि खरीप पिकांची प्रचंड हानी यामुळे ओल्या दुष्काळाचे संकट डोळ्यासमोर उभे आहे. अंतिम अहवाल ३१ ऑक्टोबरला स्पष्ट होणार असला तरी शेतकऱ्यांना मदतीची गरज तातडीची असल्याचे या आकडेवारीतून दिसते.
Web Summary : Aurangabad district's crop assessment is 47.84%, signaling a potential wet drought. Final figures are expected by October's end. Crop damage affected 2.37 lakh hectares due to excessive rainfall. Low assessment triggers government aid for farmers.
Web Summary : औरंगाबाद जिले का फसल आकलन 47.84% है, जो संभावित गीले सूखे का संकेत है। अंतिम आंकड़े अक्टूबर के अंत तक अपेक्षित हैं। अत्यधिक वर्षा के कारण 2.37 लाख हेक्टेयर फसल क्षतिग्रस्त हो गई। कम आकलन किसानों के लिए सरकारी सहायता को ट्रिगर करता है।