मराठवाड्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी आणि सलग पावसामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. विशेषतः उडीद आणि मुग पिकाचे उत्पादन तब्बल निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सरासरी हेक्टरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा असताना, यंदा जिल्ह्यात केवळ ४ क्विंटल २२ किलो उत्पादन मिळाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.
अतिवृष्टीने उद्ध्वस्त केलेली शेती
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले.
नदी-नाल्यांना पूर आला.
काठावरील शेती पूर्णपणे वाहून गेली.
जनावरे वाहून जाण्याच्या घटना, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, पिकांचे संपूर्ण नुकसान
सततच्या पावसामुळे मातीचे तापमान कमी राहिले, नायट्रोजन धुऊन गेले आणि फुलोरा–शेंगा वाढ गंभीररीत्या प्रभावित झाली. याचा थेट परिणाम मुगाच्या उत्पादनावर झाला.
मुगाची उत्पादन स्थिती
कृषी विभागाकडून नुकतेच प्रत्येक तालुक्यांचा पीक अहवाल मिळाला असून त्यानुसार मुगाचे हेक्टरी उत्पादन खालीलप्रमाणे आहे:
मुगाची उत्पादन स्थिती
| तालुका | उत्पादन (क्विंटल/किलो) |
|---|---|
| छत्रपती संभाजीनगर | चार क्विंटल सत्तर किलो |
| पैठण | चार क्विंटल चाळीस किलो |
| वैजापूर | चार क्विंटल पंचवीस किलो |
| खुलताबाद | तीन क्विंटल पंचावन्न किलो |
| गंगापूर | चार क्विंटल एकोणीस किलो |
| सिल्लोड | आठ क्विंटल साठ किलो (सर्वाधिक) |
| कन्नड | तीन क्विंटल चौसष्ट किलो |
| सोयगाव | पाच क्विंटल बत्तीस किलो |
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सरासरी उतारा: ४ क्विंटल २२ किलो
अपेक्षित उत्पादन: ८ ते १० क्विंटल
प्रत्यक्ष उत्पादन: सुमारे ५० टक्क्यांनी घट
शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाही
मुगाचे उत्पादन निम्म्यावर आल्याने मजुरी, बी-बियाणे, खत, फवारणी, सिंचन खर्च सर्व मिळून शेतकऱ्यांना हेक्टरी उत्पादन खर्चही परत मिळणे कठीण झाले आहे. विशेषतः ज्या भागात शेती पुराच्या पाण्यातून वाहून गेली, तिथे नुकसान शंभर टक्क्यांपर्यंत आहे.
उडीद पिकालाही समान फटका
मुगासोबतच उडीद पिकाचेही उत्पादन घटल्याची माहिती कृषी विभागाकडून दिली गेली आहे. शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाबाबत मोठी नाराजी असून नुकसानीचे पंचनामे त्वरित करून मदत जाहीर करण्याची मागणी वाढत आहे.
विशेषज्ज्ञांच्या मते, सततचा पाऊस, ढगाळ वातावरण, पोषकद्रव्यांचे नुकसान, शेंगा विकसीत न होणे, रोगांचा प्रादुर्भाव हे घटक मुगाच्या उत्पादन घटण्याचे मुख्य कारण आहेत. सिल्लोड तालुक्यात ८ क्विंटल ६० किलो एवढे उत्पादन दिसत असले, तरी इतर तालुक्यांत परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
शेतकऱ्यांची काय मागणी
* सर्व तालुक्यांत नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण
* शेतजमीन वाहून गेलेल्या भागांना विशेष मदत
* पिक विमा दाव्यांचे जलद सेटलमेंट करावी.
* पुन्हा पेरणी किंवा रब्बीसाठी बी-बियाणे, खत अनुदान
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठा फटका बसलेला असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था अधिकच बिकट झाली आहे. मुगाचे उत्पादन निम्म्यावर आल्याने येत्या काही महिन्यांत बाजारात मुगाच्या दरात वाढ होण्याचीही शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
Web Summary : Heavy rains in Marathwada severely damaged mung crops, reducing yields to half of the expected average. Farmers face significant losses as production costs exceed returns due to widespread crop destruction and soil erosion.
Web Summary : मराठवाड़ा में भारी बारिश से मूंग की फसल बुरी तरह प्रभावित हुई, जिससे उपज अपेक्षित औसत से आधी रह गई। व्यापक फसल विनाश और मिट्टी के कटाव के कारण किसानों को भारी नुकसान का सामना करना पड़ रहा है क्योंकि उत्पादन लागत रिटर्न से अधिक है।