Join us

Cotton Cultivation : कापसाच्या पट्ट्यात लागवडीलाच 'ब्रेक'; काय आहे कारण वाचा सविस्तर

By सुनील चरपे | Updated: August 2, 2025 14:53 IST

Cotton Cultivation : चालू खरीप हंगामात कापूस पेरणीत मोठी घसरण झाली असून, महाराष्ट्रात तब्बल ६.१२ टक्के घट नोंदली गेली आहे. दरांच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी कापसाऐवजी एरंडी, मूग, मका आणि सोयाबीनकडे वळण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे देशातही पेरणी क्षेत्रात ३.३५ टक्क्यांची घट झाली आहे. याचा परिणाम केवळ उत्पादनावर नव्हे, तर देशाच्या आयातीवरही होणार असल्याचा इशारा कृषितज्ज्ञांनी दिला आहे.(Cotton Cultivation)

Cotton Cultivation : चालू खरीप हंगामात कापूस पिकाच्या पेरणीमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात कापसाचे एकूण पेरणीक्षेत्र ३.३५ टक्क्यांनी, तर महाराष्ट्रात ६.१२ टक्क्यांनी घटले आहे. (Cotton Cultivation)

अनेक राज्यांमध्ये थोडी वाढही दिसली असली, तरी कापूस पिकाच्या दरात सातत्याने असलेली अनिश्चितता, वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेली उत्पादकता यामुळे शेतकऱ्यांनी एरंडी, मका, मूग, सोयाबीन, तीळ यांसारख्या पर्यायी पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.(Cotton Cultivation)

देशातील एकूण कापूस उत्पादन आणि पेरणीक्षेत्र यात महाराष्ट्राचा वाटा एकतृतीयांश आहे. देशात कापसाचे सरासरी पेरणीक्षेत्र १२५ लाख हेक्टर, तर महाराष्ट्रात ४५ लाख हेक्टर आहे.(Cotton Cultivation)

 मात्र, कापसाचे दर कायम दबावात राहत असल्याने, तसेच वाढता उत्पादन खर्च आणि घटती उत्पादकता व उत्पादन, यामुळे बहुतांश शेतकरी कापसाला पर्याय म्हणून इतर पिके घेत आहेत. (Cotton Cultivation)

गुजरातमध्ये एरंडी, भुईमूग, कुलथी व तीळ, तर मध्य प्रदेश व महाराष्ट्रात मूग, मका व सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले आहे.(Cotton Cultivation)

देशात एरंडीचे पेरणी क्षेत्र ६३.२० टक्क्यांनी वाढले असून, मूग १६.०८ टक्के, धान १३.४० टक्के, कुलथी १३.२४ टक्के, मका ८.४४ टक्के, तीळ ४.२८ टक्के, तर भुईमुगाचे पेरणी क्षेत्र एक टक्क्याने वाढले आहे. नायजर सीडचे पेरणी क्षेत्र ८७.१७ टक्क्यांनी घटले असून, रागी २२.७५ टक्के, तूर ८.१५ टक्के, उडीद ६.७५ टक्के व सूर्यफुलाचे पेरणीक्षेत्र ५.२४ टक्क्यांनी घटले आहे.(Cotton Cultivation)

आयात व परावलंबित्व वाढणार

पेरणी क्षेत्र घटल्याने त्या शेतमालाचे उत्पादन घटणार आहे. शेतमालाचा वापर व मागणी यातील तूट भरून काढण्यासाठी आयात केली जाणार आणि पुन्हा दर दबावात येणार आहे. सरकारच्या शेतमाल बाजारातील अवाजवी हस्तक्षेपामुळे समाधानकारक दर मिळाले नाहीत, तर पुन्हा पेरणी क्षेत्र व उत्पादन कमी होऊन आयात वाढणार. या दुष्टचक्रामुळे आयातीसोबतच देशाचे परावलंबित्व वाढणार आहे, अशी प्रतिक्रिया कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केली.

कापसाच्या राज्यनिहाय पेरणी 

राज्यसन २०२४-२५सन २०२५-२६घट/वाढ (%)
पंजाब१.०००१.२००२०.००% वाढ
हरयाणा४.७५०४.०००१५.७९% घट
राजस्थान५.७५०६.४००११.३०% वाढ
गुजरात२३.१५२२०.१६८१२.८९% घट
महाराष्ट्र४०.४९२३८.०१४६.१२% घट
मध्य प्रदेश५.८६३४.९७३१५.१८% घट
तेलंगणा१६.४५८१७.५१८६.४४% वाढ
आंध्र प्रदेश१.८६०२.४२०३०.११% वाढ
कर्नाटक६.४०५७.४९९१७.०८% वाढ

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन दरात उसळी; जुन्या सोयाबीनला सोन्याचा भाव वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूससोयाबीनशेतकरीशेती