२० आॅगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:18 AM2017-08-16T05:18:31+5:302017-08-16T05:18:31+5:30

विविध धर्मातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना दृढ होण्यासाठी राज्यात २० आॅगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा आयोजित करण्यात आला

Social unity fortnightly by 20th August | २० आॅगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा

२० आॅगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा

Next

मुंबई : विविध धर्मातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना दृढ होण्यासाठी राज्यात २० आॅगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. अल्पसंख्याक विकास विभागाकडून पाच सप्टेंबरपर्यत चालणाºया या उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालये, मुख्यालयामध्ये सर्वधर्म प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्य दरवर्षी देशभरात २० आॅगस्टला सदभावना दिन व त्यापुढील १५ दिवस हे सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरे केले जातात. त्यानुसार यावर्षीही २० आॅगस्टपासून राज्यभरात समूहगान व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

Web Title: Social unity fortnightly by 20th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.