कुटुंब झाले बेपत्ता...

By admin | Published: January 12, 2016 01:51 AM2016-01-12T01:51:38+5:302016-01-12T01:51:38+5:30

नालासोपारा शहरातील दोन कुटुंबे गायब असल्याची घटना ताजी असतानाच आज पाच जणांचे आणखी एक कुुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात

Family has disappeared ... | कुटुंब झाले बेपत्ता...

कुटुंब झाले बेपत्ता...

Next

वसई : नालासोपारा शहरातील दोन कुटुंबे गायब असल्याची घटना ताजी असतानाच आज पाच जणांचे आणखी एक कुुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात
दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरीत अमित चौबे (३२) पत्नी रीटा (३०), मुलगी खुशी (१०), ननशी (५) आणि मुलगा मनोज (७) असे कुटुंब राहत होते. एका कंपनीत कामाला असलेले अमित चौबे संध्याकाळी वडा पाव विक्रीचा व्यवसाय करतात. आज त्यांचे भार्इंदर येथे राहणारे काका मनीष चौबे यांनी तुळींज पोलीस ठाण्यात येऊन अमित चौबे, त्याची पत्नी आणि तीन मुले गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
अमित यांच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार, अमित कर्ज बाजारी झाल्याने प्रचंड तणावाखाली होते. त्यामुळे अमितच्या गायब होण्यामागे हेच कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, याआधी गेल्या महिन्यात इगवे आणि इंद्रीसे कुटुंब गायब झाल्याची तक्रार तुळंींज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या कुटुंबाचा अद्याप ठावठिकाणा सापडला नसताना चौबे कुटुंब गायब झाल्याची तक्रार झाल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Family has disappeared ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.