सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर...; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:55 PM2022-06-17T13:55:42+5:302022-06-17T13:56:03+5:30

राजकीय आकसापायी विरोधकांना अनधिकृत बांधकामांच्या नोटीसी पाठवण्यात दाखवली जाणारी तत्पर्ता, अनधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यातही दाखवावी असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

BJP MLA Nitesh Rane letter to CM Uddhav Thackeray regarding unauthorized construction in Mumbai | सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर...; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर...; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Next

मुंबई - सत्तेची लालसा, अधिक मतांची लालसा जीवघेणी ठरते आहे. मुंबईबाहेरील लोकांनाच्या मतांच्या लोभात अनाधिकृत बांधकामांना तुमचे नगरसेवक परवानी देतात. मुंबईत १४ फुटाच्यावर वाढीव बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहर नजर असल्यानं ही बांधकामं राजरोज सुरु आहेत. अनाधिकृत बांधकामं वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहचली आहेत. त्यामुळं जीवाशी खेळ करत तिथं दोन दोन मजली झोपडपट्ट्या उभारल्या आहेत असा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर केला आहे. 

नितेश राणेंनी(BJP Nitesh Rane) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) पत्र पाठवलं आहे. या पत्रात म्हटलंय की, वारंवार अनधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यात लोकांचा जीव बळी जातोय. आपण मात्र शांतेत हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. यामुळं निर्माण होणारी तुमची असंवेदनशील मुख्यमंत्र्याची प्रतिमा सामान्यांना हवालदिल करणारी आहे. सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो. गुन्हेगारीचं साम्राज्य, भ्रष्टाचाराची दलाल वाढत वाढत सामान्य मुंबईकरांच्या उंबऱ्यापर्यंत पोहचलंय. तुम्ही देखील मुंबईचे रहिवाशी असल्याने ढिसाळ कारभाराची राड तुमचा उंबरा एकनाएक दिवस ओलांडणारच होती. झालं ही तसंच असं त्यांनी म्हटलं. 

तसेच गुरुवारी ९ जूनला तुमच्या निवास्थानाहून हाकेच्या अंतरावर असलेलं वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळलं. १७ जण जीवन मरणाशी लढा देत आहेत. ४० वर्षीय युवकाचा बळी केला. त्या कुटुंबांनी फोडलेल्या टाहोने संबंध मुंबईचं काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथं भेट देऊन विचारपुस करण्याची तसदीही घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगलेत असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. 

दरम्यान, वर्षभरापूर्वी मालाड मालवणीमध्ये घराचं वाढीव अनधिकृत बांधकाम ढासळून ११ जणांचा बळी गेला. मानखुर्दमध्येही असंच प्रकरण घडलं. या जळत्या चितांचा प्रकाश ही तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहचत नाही का? अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कुणाचीही गय करु नका असे आदेश आपण दिलेत मात्र आयुक्त कारवाई करत नाहीयेत. अनधिकृत बांधकामांना दिली जाणारी परवानगी जीवघेणी ठरतीये. राजकीय आकसापायी विरोधकांना अनधिकृत बांधकामांच्या नोटीसी पाठवण्यात दाखवली जाणारी तत्पर्ता, अनधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यातही दाखवावी. अन्यथा मुख्यमंत्री जनतेचे नसून ठराविक पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवकांसाठी आहे की काय? असा संदेश जनमानसात दृढ होईल असाही टोला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

Web Title: BJP MLA Nitesh Rane letter to CM Uddhav Thackeray regarding unauthorized construction in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.