Join us  

मुंबईत पहाटेपासूनच कोसळधारा, 'एक्सप्रेस वे'वर वाहनांची भली मोठी रांग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 10:29 AM

1 / 9
मुंबईत ९ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर पुढील तीन दिवस हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात रेड अलर्ट जाहीर केला. त्यानंतर रविवारी त्यात बदल करून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला.
2 / 9
मुंबई, कोकणातील बहुतांश ठिकाणी पाऊस न झाल्याने हा अलर्ट नागरिकांसाठी होता की पावसासाठी, अशी गमतीदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती.
3 / 9
बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मोठ्या पावसामुळे रस्त्यावर आणि सखल भागातही पाणी साचलंय.
4 / 9
रविवारी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आता, हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत ‘रेड ॲलर्ट’ दिला असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा रविवारी दिला.
5 / 9
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा होता. मात्र, पावसाचे ढग दिसलेच नाही, आज सकाळीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
6 / 9
सकाळीच कोसळलेल्या पावसामुळे मुंबईसह उपनगरातील विविध भागात पाणी साचले असून शहरातील ट्रॅफिकही जाम झाले आहे.
7 / 9
मुंबईसह एक्सप्रेस वेस्टर्न हायवेवरही मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी झाल्याने काहीकाळ चक्का जाम झाला आहे.
8 / 9
शहरासह उपनगरातही पावसाचे आगमन झाल्याने चाकरमान्यांनी पावसात भिजतच मार्गक्रमण करायला सुरुवात केली आहे
9 / 9
मुंबई शहरात 28.55 मिमि पावसाची नोंद झाली असून पूर्व आणि पश्चिम उपनगरात सरासरी 18 मिमि पावसाची नोंद झाली आहे.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMumbaiमुंबईRainपाऊस