Join us  

Sadabhau Khot: "महाराष्ट्रातील राजकीय आजाराचं मूळ मातोश्री, तर औषध देवेंद्र फडणवीस"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 6:02 PM

1 / 9
राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना अनेक विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ राजकारणी आणि सर्वसामान्य जनताही चिंता व्यक्त करत आहे.
2 / 9
शिवसेना भाजप यांच्यातील एममेकांच्या सुडाचं राजकारण पाहता, सर्वसामान्यांचे प्रश्न बाजुला पडले असून नेतेमंडळींना आतमध्ये टाकण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येते.
3 / 9
राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण करण्यासाठी केलेला हट्ट्, त्यानंतर शिवसैनिकांनी दाखवलेला आक्रमक पवित्रा आणि मुंबई पोलिसांनी घेतलेली एक्शन सध्या चर्चेत आहे.
4 / 9
याच दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्यामुळे भाजप नेतेही तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
5 / 9
एकंदरीत राज्यात चाललेलं हे राजकारण कुणीही चांगलं म्हणत नाही. विशेष म्हणजे जे हे करतायंत तेही ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगत आहेत.
6 / 9
यावरुनच, रयत शेतकरी संघटनेचे नेते आणि भाजपचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी हे राजकारण, राजकीय सूड नाट्य असल्याचे म्हणत शिवसेनेवर प्रहार केला आहे.
7 / 9
'महाराष्ट्रातील जनतेसाठी राजकारण हा आजार असेल तर त्याचं मूळ मातोश्री आहे आणि औषध देवेंद्र फडणवीस ( @Dev_Fadnavis ) सरकार आहे.', असे खोत यांनी म्हटलं.
8 / 9
सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक केलं आहे.
9 / 9
मात्र, या अशा टिकांमुळेच, व्यक्तीगत टिका टिपण्णामुळेच सध्याचं राजकारण महाराष्ट्राची राजकीय परंपरा मोडीत काढताना दिसत आहे.
टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMumbaiमुंबईPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस