Join us  

मला न्याय मिळावा, कंगनाने घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 9:43 PM

1 / 11
कंगनाच्या मागे कोणाचा हात आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, संसदीय अधिवेशनावर आता आमचं लक्ष आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
2 / 11
दुसरीकडे कंगनाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट घेतली असून माझ्यावर अन्याय झाल्याचं सांगत बीएमसीच्या कारवाईची व्यथा राज्यपाल यांच्यापुढे मांडली.
3 / 11
कंगनाने बहिण रंगोलीसह राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली, मी माझी बाजू राज्यपाल यांना समजावून सांगितली. तसेच मला या प्रकरणात न्याय मिळावा, अशी विनंती त्यांच्याकडे केल्याचे कंगनाने म्हटले.
4 / 11
राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि विशेषत: महिलांचा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, म्हणून मला न्याय मिळावा, असेही कंगना म्हणाली.
5 / 11
कंगना मुंबईत येणार त्याचदिवशी बीएमसीच्यावतीने कंगनाच्या कार्यालयावर हातोडा फिरवण्यात आला होता. त्यानंतर, कंगनाने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्यांच्यावर टीका केली.
6 / 11
कंगना व शिवसेना वादात भाजपा नेत्यांनी कंगनाची बाजू घेत, शिवसेनेवर गुंडागर्दी व ठोकशाहीचा आरोप केला आहे. तसेच, कंगनावरील कारवाई चुकीची असल्याचेही म्हटले.
7 / 11
रिपाइं नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही कंगनाच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. तसेच, राज्यपालांशी बोलून कंगनाला न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासनही आठवलेंनी दिले होते.
8 / 11
शिवसैनिकांनी मुंबईत एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र शेअर केल्यानं ही मारहाण करण्यात आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला.
9 / 11
केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, तसेच त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.
10 / 11
कंगना आणि शिवसेना वाद संपला असतानाच शिवसैनिकांनी निवृत्त नेव्हल अधिकाऱ्याला मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे, पुन्हा एकदा कंगनाचा व शिवसेनेचा विषय चर्चेचा विषय बनला आहे.
11 / 11
शिवसेनेकडून कंगना हा विषय आमच्यासाठी संपल्याचं सांगण्यात आलंय. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आज फेसबुक लाईव्हमध्ये महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव असल्याचं म्हटलं.
टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीKangana Ranautकंगना राणौत