Join us  

Chembur Landslide News and Photos: मुंबईत पावसाचं थैमान! कुठं लॅंडस्लाईड, कुठं भिंत कोसळली, तर कुठं झाडांची पडझड; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:05 PM

1 / 13
मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Chembur Landslide News and Photos)
2 / 13
चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली आहे. यात १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
3 / 13
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पाच घरे पडली आहेत. दोन घरांतून मलबा काढण्यात आला आहे. तर तीन घरांतील मलबा काढणे अद्याप बाकी आहे.
4 / 13
विक्रोळी भागात एक इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झल्याचे आणि भांडूप भागातही एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय, फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले.
5 / 13
तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसाचा भांडुप पंपिंग स्टेशनच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
6 / 13
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील भिंत खचल्यामुळे जवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
7 / 13
तसेच ठाणे राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे आगार क्रमांक २ खोपट येथील बस आगारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
8 / 13
पालघर जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला असून, रेल्वे सेवा, बस सेवा बाधित झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाल्याचे सांगितले जात आहे.
9 / 13
मध्यरात्री पडलेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून, अनेक भागांतील रस्ते जलमय झाल्यामुळे प्रवासात अडथळे येत आहेत.
10 / 13
सायनचे गांधीमार्केट परिसरातही पाणी साचले आहे. सायनमध्ये पाणी साचल्याने या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
11 / 13
जोरदार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता आणि इतर सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
12 / 13
बोरिवली पूर्वेकडील शांतीवन भागात दहिसर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या भागात पूरसदृश्य परिस्थिती झाल्याचे पाहायला मिळाले.
13 / 13
दुसरीकडे कांदिवली पूर्व भागातही जोरदार पाऊस पडल्यामुळे रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. यामुळे नागरिकांची झोपमोड तर झालीच शिवाय त्यांना संसार वाचवण्यासाठी धावपळही करावी लागल्याची माहिती मिळाली आहे.
टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईthaneठाणेpalgharपालघर