Join us  

26 July Mumbai Floods: 'त्या' जलप्रलयाच्या आठवणींनी आजही घाबरते मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:37 AM

1 / 5
26 जुलै 2005च्या महापुराला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत पडलेल्या 944 मिलीमीटर पावसामुळे मुंबापुरी पाण्याखाली गेली होती. या पावसाने शहर तीन दिवस बंद होते.
2 / 5
मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईची तुंबई झाली होती. साचल्या पाण्यामुळे मुंबईकर ठिकठिकाणी अडकले होते. लोकांवर रस्ते, लोकल, वाहनांमध्ये राहण्याची वेळ आली होती.
3 / 5
या दिवशी 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर 500 कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या मालमत्तेचं नुकसान झाले होते.
4 / 5
दरम्यान, या घटनेला इतकी वर्षे उलटूनही महापालिकेनं अद्यापही पाण्याचा निचरा होण्यासाठी अपेक्षित बदल केलेले नाहीत.
5 / 5
परिणामी, 300 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरही मुंबईचे जनजीवन विस्कळीत होत असून; महापूर नाही, पण येथील पुराचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.
टॅग्स :floodपूरMumbaiमुंबईRainपाऊस