तुम्हाला साहेबांची शपथ.. शांत व्हा..
By Admin | Updated: June 5, 2014 02:43 IST2014-06-05T02:43:10+5:302014-06-05T02:43:10+5:30
तुम्ही तुमच्या साहेबांच्या अंत्यदर्शनासाठी आलात ना.. गोंधळ करू नका..शांत राहा.. चेंगराचेंगरी होईल.. दगडफेक करू नका.. पोलिसांना सहकार्य करा..

तुम्हाला साहेबांची शपथ.. शांत व्हा..
>व्यंकटेश वैष्णव - बीड
तुम्ही तुमच्या साहेबांच्या अंत्यदर्शनासाठी आलात ना.. गोंधळ करू नका..शांत राहा.. चेंगराचेंगरी होईल.. दगडफेक करू नका.. पोलिसांना सहकार्य करा.. चेंगराचेंगरीत कोणाला इजा होईल.. कार्यकत्र्यानो तुम्हाला तुमच्या साहेबांची शपथ आहे. साहेबांचा अवमान होईल असे काही करू नका, अशी विनंती व आवाहन पंकजा पालवे यांनी कार्यकत्र्याना पाणावलेल्या डोळ्यांनी दुखा:चा अवंढा गिळत केले. अन् क्षणार्धातच पाच लाखांच्यावर जमलेला जनसागर शांत झाला.
परळी येथील वैद्यनाथ कारखान्याच्या परिसरातील मैदानावर बुधवारी गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव कार्यकत्र्याच्या अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. भावनाविवश झालेल्या कार्यकत्र्याना आवरता- आवरता पोलिसांची दमछाक उडाली. जिकडे पाहाल तिकडे जनसागरच. कार्यकत्र्याच्या काळजाचा ठाव घेणारा, अन् कार्यकत्र्यासाठी जिवाचं रान करणारा नेता शांत झोपलाच कसा, असे भाव कार्यकत्र्याच्या चेह:यावर दिसत होते. जमलेल्या जनसमुदायाला थांबवायचं कसं हा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर उभा ठाकला होता. प्रकाश जावडेकरांपासून ते पाशा पटेल, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस यांच्यार्पयत सगळेच नेते माईकचा ताबा घेऊन संतप्त कार्यकत्र्याना शांत करत होते. मात्र कार्यकर्ते काही केल्या शांत बसत नव्हते. हभप नामदेवशास्त्री सानप यांनीदेखील कार्यकत्र्याना शांत रहाण्याचे आवाहन केले; परंतु कार्यकर्ते आवरत नव्हते. शेवटी दुपारी बाराच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव वैद्यनाथ कारखान्याच्या मैदानावर आणले अन् कार्यकर्ते धाय मोकलून रडू लागले. दरम्यान काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तेव्हाच पंकजा मुंडे या मंचावर आल्या कार्यकत्र्यानी त्यांच्या हातात माईक देताच त्यांना रडू कोसळले. पण कार्यकत्र्याची आपल्या साहेबाला शेवटचे भेटण्यासाठी ढकला ढकली सुरू झालेली होती. कार्यकत्र्याना पोलीस आडवत असल्याने कार्यकत्र्यानी चिडून दगडफेक करण्यास सुरूवात केलेली पाहून पंकजा मुंडे यांनी आपले अश्रू आवरले. अन् आवाहन केले. तुमच्या साहेबांचे शेवटचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलात ना मग गोंधळ करू नका.. दगडफेक करू नका.. पोलिसांना सहकार्य करा. तुम्हाला तुमच्या साहेबांची शपथ आहे तुम्हाला, असे आवाहन पंकजा यांनी कार्यकत्र्याना करताच पाच लाखांच्यावर जमलेला जनसागर क्षणभर शांत झाला. सगळेच कार्यकर्ते धायमोकलून रडू लागले.
पाच ठिकाणी ‘पार्किग’
परळी येथील वैद्यनाथ कारखाना परिसरातील मैदानावर गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीसाठी देशभरातून कार्यकर्ते आले होते. यावेळी पाच लाखांच्यावर जनसमुदाय उपस्थित होता. आलेल्या कार्यकत्र्याची वाहने ‘पार्किग’ करण्यासाठी पाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये कारखाना परिसरातील चारही दिशेला पार्किगची व्यवस्था करण्यात आली होती. यासह अंत्यसंस्कार स्थळाच्या बाजूलाच व्हीआयपींसाठी पार्किग व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आलेल्या कार्यकत्र्याची गर्दी लक्षात घेता करण्यात आलेल्या पाचही पार्किग अपु:या पडल्या असल्याचे बुधवारी पहावयास मिळाले. कार्यकत्र्यानी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या परिसरातील आठ किलोमीटर क्षेत्रत मिळेल त्या जागेवर आपली वाहने उभी केली होती.
अंत्यविधी आटोपल्यानंतर कार्यकर्ते आपापली वाहने काढून मार्गस्थ होत असताना मोठय़ा प्रमाणात वाहनकोंडी झाली. परळीच्या बाहेर येण्यासाठी तीन ते चार तास वाहन कोंडी झाली होती. कार्यकत्र्याची वाहने मार्गस्थ करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.
शेवटी पोलिसांनी काही कार्यकत्र्याची मदत घेतली व देशभरातून
आलेल्या कार्यकत्र्याची वाहने
मार्गस्थ केले.
संयम सुटला
गोपीनाथराव मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच त्यांच्यावर प्रेम करणा:या लाखो कार्यकत्र्याची वर्दळ येथे जाणवत होती़ कानाकोप:यातून कार्यकर्ते परळीत दाखल झाले होत़़े वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आल़े अंत्यदर्शनासाठी स्वतंत्र मंच बनविला होता़ त्याजवळच अंत्यविधीसाठी चबूतरा बांधला होता़ या दोन्ही ठिकाणी फुलांची सजावट केली होती़ पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटस् लावले होत़े मुंडे यांचे पार्थिव साडेअकरा वाजता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आले.
एरवी साहेबांची ‘एंट्री’ डामडौलात असायची;परंतु त्यांना स्तब्धावस्थेत पाहून कार्यकत्र्यानी एकच टाहो फोडला़ यावेळी चबुत:याच्या समोरील बॅरिकेट तोडून कार्यकत्र्यानी ‘डी’ झोनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला़ त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला़
त्यानंतर जमाव पांगला; पण दुस:याच क्षणी जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली़ त्यामुळे एकच गोंधळ उडाला़ पोलिसांच्या दिशेने भरभर दगडे भिरकावण्यात आली़ त्यानंतर पंकजा पालवे, मठाधिपती नामदेव शास्त्री आदींनी आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.