मुंबई - बॉलिवूडच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण पेटून उठले आहे. योगींकडून सुरू असलेल्या बॉलिवूड कलाकारांच्या भेटीगाठींमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खरमरीत सवाल विचारला आहे.बॉलिवूड मुंबई सोडून उत्तर प्रदेशमध्ये का जाईल? बॉलिवूडवाले उत्तर प्रदेशमध्ये डाकू बनायला जाणार का? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच कुणीही बॉलिवूडला मुंबईतून बाहेर नेऊ शकत नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
बॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का? शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल
By बाळकृष्ण परब | Updated: December 2, 2020 20:13 IST
Bollywood Mumbai News : बॉलिवूडच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण पेटून उठले आहे.
बॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का? शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल
ठळक मुद्देयोगींकडून सुरू असलेल्या बॉलिवूड कलाकारांच्या भेटीगाठींमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील पक्ष आक्रमक बॉलिवूड मुंबई सोडून उत्तर प्रदेशमध्ये का जाईल? बॉलिवूडवाले उत्तर प्रदेशमध्ये डाकू बनायला जाणार का? गुलाबराव पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारला खरमरीत सवाल