पाणी टंचाई नसलेला प्रभाग

By Admin | Updated: March 10, 2015 22:38 IST2015-03-10T22:38:16+5:302015-03-10T22:38:16+5:30

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६८ चे प्रतिनिधीत्व बहुजन विकास आघाडीचे राजेंद्र कांबळी करीत आहेत. या पूर्वीही नगरपरिषद अस्तित्वात असताना

Water scarcity division | पाणी टंचाई नसलेला प्रभाग

पाणी टंचाई नसलेला प्रभाग

दिपक मोहिते, वसई
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६८ चे प्रतिनिधीत्व बहुजन विकास आघाडीचे राजेंद्र कांबळी करीत आहेत. या पूर्वीही नगरपरिषद अस्तित्वात असताना कांबळी दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरपरिषदेच्या काळात विकासकामे मार्गी लागल्यामुळे गेल्या साडेचार वर्षात विकासकामांवर केवळ ३ कोटी रू. खर्च झाले. महानगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये हा प्रभाग विकसीत प्रभाग म्हणून ओळखला जातो.
अनेक प्रभागांमध्ये पाणीसमस्या कायम असताना या प्रभागात मात्र पाणीटंचाई जाणवत नाही. प्रभागात ९५ टक्के पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरीकांना उन्हाळ्यातही टँकरचा आधार घ्यावा लागत नाही. प्रभागामध्ये समतानगर, जयराजनगर, गोकुळपार्क, वसंतकरीष्मा व आसपासच्या परिसराचा समावेश आहे. दैनंदिन साफसफाईच्या कामावर देखरेख ठेवण्यात येत असल्याने प्रभागात कचऱ्याचे अस्तित्व दिसत नाही. साडेचार वर्षात खर्च केलेल्या ३ कोटी रू. ने रस्ते, गटारे, उद्याने व अन्य विकासकामे मार्गी लागली.

Web Title: Water scarcity division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.