पाणीकपातीमुळे भिवंडीत पाणीचोरांत वाढ
By Admin | Updated: May 22, 2014 04:25 IST2014-05-22T04:25:10+5:302014-05-22T04:25:10+5:30
उन्हाळ्यामुळे पाटबंधारे खात्यामार्फत जानेवारीपासून १४ टक्के कपात सुरू आहे. भिवंडी महानगरपालिकेस स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन इन्फ्रा कंपनीकडून पाणीपुरवठा होत आहे.

पाणीकपातीमुळे भिवंडीत पाणीचोरांत वाढ
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात बुधवार ते गुरुवार २४ तास पाणीकपात होणार असल्याने पाणीचोरांत वाढ होणार असून पालिकेचे दक्षता पथक, भरारी पथकावर नियंत्रण नसलेल्या मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्याची आयुक्तांनी बदली करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. उन्हाळ्यामुळे पाटबंधारे खात्यामार्फत जानेवारीपासून १४ टक्के कपात सुरू आहे. भिवंडी महानगरपालिकेस स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन इन्फ्रा कंपनीकडून पाणीपुरवठा होत आहे. १५ जून २०१४ पर्यंत प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी सकाळी ९ ते गुरुवार सकाळी ९ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहील. त्याचा परिणाम शहरातील हॉटेल व्यावसायिकांपासून ते कापडावर प्रक्रिया करणार्या डाइंगवर होणार आहे. डाइंग व सायझिंगमध्ये खाजगी विहिरीमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर पाण्याच्या जलवाहिन्या तोडून मनपाचे पाणी चोरल्याची माहिती पालिकेस यापूर्वी दिलेली होती. परंतु, पालिकेचे दक्षता पथक व भरारी पथक दुर्लक्ष करत असते, असा आरोप होत असून स्टेम व मुंबई महानगरपालिकेकडून विकत घेतलेल्या पाण्याचे बिल शहरातील करदात्यांच्या पैशांतून अदा केले जाते. तरीही नागरिकांना पाणी मिळत नाही.