विदर्भ, मराठवाडा गारठला; मुंबईतही थंडीची चाहूल लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:07 AM2020-12-06T04:07:20+5:302020-12-06T04:07:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बंगालच्या उपसागरातील बुरेवी चक्रीवादळाचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले असून ते सध्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या ...

Vidarbha, Marathwada Garthala; It was cold in Mumbai too | विदर्भ, मराठवाडा गारठला; मुंबईतही थंडीची चाहूल लागली

विदर्भ, मराठवाडा गारठला; मुंबईतही थंडीची चाहूल लागली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बंगालच्या उपसागरातील बुरेवी चक्रीवादळाचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले असून ते सध्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या जवळ आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा जोर आता कमी होऊ लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात थंडीचे पुनरागमन होऊ लागले आहे. विदर्भातील अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे तामिळनाडु, पाँडेचरी, दक्षिण केरळमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. रविवारीही तामिळनाडु, पाँडेचरी, दक्षिण केरळ, लक्षद्वीप येथील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात आता उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातील अनेक भागातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घसरले आहे. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणच्या किमान तापमानात किंचित घट झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

पुणे ११.५, लोहगाव १३.२, जळगाव १२.६, कोल्हापूर १७.७, महाबळेश्वर १४.३, मालेगाव १३.६, नाशिक ११.१, सांगली १६, सातारा १३.३, सोलापूर १४.४, मुंबई २१.४, सांताक्रुझ १८.४, रत्नागिरी २०.६, पणजी २२.७, डहाणू १८.८, औरंगाबाद १३, परभणी १०.६, नांदेड १४, अकोला १३.१, अमरावती १४.४, बुलडाणा १४.२, चंद्रपूर १६, गोंदिया १०.५, नागपूर १२.४, वाशिम १२.८, वर्धा १३.४.

Web Title: Vidarbha, Marathwada Garthala; It was cold in Mumbai too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.