Join us

वाहन विकले, पण तुमचे नाव काढले का?; जूने वाहन खरेदी करताय, मग हे नक्की करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:20 IST

मुंबई : वाहन विकल्यानंतर परिवहन विभागातील प्रक्रिया पूर्ण करून ते वाहन संबंधिताच्या नावे करावे लागते. ही वाहन ट्रान्सफर करण्याची ...

मुंबई : वाहन विकल्यानंतर परिवहन विभागातील प्रक्रिया पूर्ण करून ते वाहन संबंधिताच्या नावे करावे लागते. ही वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अनेकजण करीत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांचा अपघात झाला किंवा ते चोरीस गेले तर अडचणी येतात. त्यामुळे वाहन विकले; पण तुमचे नाव काढले का याची खात्री करायला हवी.

जुन्या गाडीची विक्री अथवा ती खरेदी करत असाल तर अनेकदा रजिस्ट्रेशन ट्रान्सफर करण्यासाठी त्याला अडचणींचा सामना करावा लागतो. कोणतेही जुने वाहन खरेदी केल्यावर आरसी तुमच्या नावावर करून घ्यावी लागते. त्याशिवाय तुम्ही त्या गाडीचे कायदेशीर मालक होत नाही. मोटार वाहन मालकी हस्तांतरण केल्याशिवाय तुम्हाला वाहनावर हक्क सांगता येत नाही. अपघातावेळी तर अनेक क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. तेव्हा भविष्यातील त्रासापासून वाचण्यासाठी वेळीच हा बदल करणे गरजेचे आहे.

वाहन ट्रान्सफर करणे सोपे

वाहन ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या परिवहन कार्यालयात धाव घ्यावी लागेल. थेट अर्ज करून आरसी बुक तुमच्या नावावर करता येईल. गाडीसंबंधीची सर्व कागदपत्रे शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर संबंधित तारखेला कार्यालयात हजर रहावे लागेल. कोणत्याही वाहनाची खरेदी-विक्रीच्या १४ दिवसानंतर मोटार वाहन मालकी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, असा कायदा सांगतो. ३० दिवसानंतर आरसी ट्रान्सफर होऊन स्मार्ट कार्डच्या रूपात वाहनधारकाच्या पत्त्यावर पाठविली जाते. जर वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करायचे असेल तर अर्ज क्रमांक २८ चा वापर करण्यात येतो.

कोणत्या वर्षी किती वाहनांची चोरी?

२०१७ ३०१२

२०१८ ३२०३

२०१९ २६९३

२०२० २८०१

२०२१ ३२८२

२) कोणत्या वर्षी किती प्राणांतिक अपघात?

२०१८ -४५६

२०१९-४२०

२०२०-३३८