मार्चर्पयत एसी लोकल
By Admin | Updated: December 14, 2014 02:01 IST2014-12-14T02:01:09+5:302014-12-14T02:01:09+5:30
मार्च 2015र्पयत एसी लोकल मुंबईत दाखल होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. ही लोकल आल्यानंतर प्रत्यक्षात सेवेत येण्यास प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.

मार्चर्पयत एसी लोकल
मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची माहिती
मुंबई : मार्च 2015र्पयत एसी लोकल मुंबईत दाखल होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. ही लोकल आल्यानंतर प्रत्यक्षात सेवेत येण्यास प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे एकूणच या एसी लोकलला लेटमार्क लागल्याचे सांगितले जाते.
पश्चिम रेल्वेमार्गावर सिमेन्स कंपनीच्या लोकल धावत असून, या लोकल अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या. आता पुढील काही महिन्यांत बम्बार्डियर कंपनीच्या लोकलही पश्चिम रेल्वेमार्गावर येणार आहेत. यानंतर पश्चिम रेल्वे प्रवासी वाट पाहत असलेली एसी लोकलही ताफ्यात येणार आहे. ही एसी लोकल मार्च 2015र्पयत मुंबईत दाखल होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईतील एलटीटी येथील एका कार्यक्रमादरम्यान दिली. चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) ही लोकल बनत असून, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. त्यामध्ये काय सुविधा असतील तसेच अनेक तांत्रिक बाबींची माहिती घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.
एसी लोकल 2013च्या अखेरीस येणार होती. त्यानंतर 2014मध्ये चार वेळा या लोकलला मुहूर्त देण्यात आला. मात्र त्यानंतर 2015मध्ये ही लोकल दाखल होईल, असे सांगण्यात आले होते. आता रेल्वेमंत्र्यांनी मार्च 2015मध्ये ती मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती दिल्याने या लोकलला लेटमार्कच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही लोकल आल्यानंतर तिची चाचणी होईल आणि ती प्रत्यक्षात ताफ्यात येण्यास थोडा कालावधी जाणार असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. (प्रतिनिधी)
अपघातग्रस्त प्रवाशाला त्वरित उपचार देण्यावर भर
रेल्वेत मोठय़ा प्रमाणात अपघात होत असून, यात दोन ते तीन हजार प्रवासी मृत्यू आणि तेवढय़ाच प्रमाणात प्रवासी जखमी होत आहेत. मात्र प्रवाशांना त्वरित उपचार काही कारणास्तव मिळत नाहीत.
उपचार मिळण्यापूर्वी अनेक प्रक्रियेतून अपघातग्रस्त प्रवाशाला जावे लागते. हे पाहता अपघातग्रस्त प्रवाशाला त्वरित उपचार मिळावेत यावर भर देत असून, त्यावर उपाय शोधत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
एलटीटी ते आझमगढ साप्ताहिक एक्स्प्रेस, बांद्रा टर्मिनस-जयपूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि बांद्रा टर्मिनस-लखनौ साप्ताहिक एक्स्प्रेसला हिरवा ङोंडा दाखवण्यात आला. वसई रोड-दिवा-रोहा विभागासाठी नवीन डेमू ट्रेन दिवा येथून चालविण्यात आली. त्याचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. या वेळी दिवा येथे खा. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्याचप्रमाणो एलटीटी ते चेन्नई सेंट्रल साप्ताहिक एक्स्प्रेस आणि एलटीटी ते करमाळी एसी ट्रेनचीही घोषणा करण्यात आली.
महिला प्रवाशांच्या
सुरक्षेसाठी महिला वाहिनी
महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या सहकार्याने महिला वाहिनी बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकल डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचाही विचार केला जात असल्याचे ते म्हणाले.
मोबाइल तिकीट सेवा एका महिन्यात
तिकिटाच्या रांगेतून सुटका करण्यासाठी मोबाइलवरूनही प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे आणि ही सेवाही लवकरच म्हणजेच एका महिन्यात सुरू केली जाईल, अशी माहिती प्रभू यांनी दिली.
मोठय़ा प्रमाणात कंत्रटदारांचा होणार प्रवेश
प्रवासी सेवा आणि सुरक्षेवर भर दिला जाणार असून, यात प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्थानकांचा विकास करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कंत्रटदारांना आमंत्रित केले जाणार आहे. त्यासाठी अटी घालण्यात येतील आणि त्यासाठी लागणारी प्रक्रिया पारदर्शक असेल, असे प्रभू यांनी सांगितले. ट्रेनचे डबे, खानपान सेवा, लॉन्ड्री सेवा सुधारण्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांच्या कामकाजातही सुधारणा केली जाणार आहे.
नवीन मार्गाच्या
निधीसाठी समिती
नवीन मार्ग किंवा ट्रॅक बनविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. त्यासाठी एक समिती बनविण्यात आली असून, तीन आठवडय़ांत त्याचा अहवाल येणार आहे.