गढूळ पाण्याने आजारांची साथ
By Admin | Updated: August 2, 2014 23:02 IST2014-08-02T23:02:18+5:302014-08-02T23:02:18+5:30
मनोरवासियांना सध्या गढूळ पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे मलेरीया, गॅस्ट्रो, जुलाबाच्या आजारात वाढ झाली आहे.

गढूळ पाण्याने आजारांची साथ
मनोर : मनोरवासियांना सध्या गढूळ पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे मलेरीया, गॅस्ट्रो, जुलाबाच्या आजारात वाढ झाली आहे. ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमध्ये शेकडो रुग्ण उपचार घेताना दिसत असून मनोर ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे मनोरवासियांवर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मनोर ग्रामपंचायत परिसरासाठी वैतरणा नदीतून विहीरीतील पंपद्वारे थेट पाणी मनोर येथील तयार केलेल्या टाकीमध्ये सोडले जाते. मनोरमध्ये पाणी शुध्दीकरण मशीन नसल्यामुळे पाण्याच्या नळाद्वारे प्रत्येक घरामध्ये पुरवठा केला जातो, परंतू पावसाळय़ात नदीचे पाणी गढूळ असल्याने त्याचा वापर कपडे धुण्यासाठी, पिण्यासाठी, आंघोळीसाठी केला जात आहे.
तसेच मनोर बाजार पेठ असल्यामुळे दर दिवस 5क् ते 6क् गावातील आदिवासी व इतर समाजाचे लोक येथे ये- जा करीत असतात, तसेच शाळकरी विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात दर दिवशी मनोरला येतात. सर्वाना हॉटेलमध्ये किंवा मित्रंच्या घरी गढूळ पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. सध्या मनोर ग्रामीण रुग्णालय व इतर खाजगी रुग्णालयामध्ये विविध आजाराने नागरिकांना ग्रासले असून रुग्ण उपचार घेताना दिसत आहेत. (वार्ताहर)
नळयोजना लालफितीत
4मनोर ग्रामपंचायतीने कोटय़वधी रुपयांची पाणी पुरवठा नळ योजना मंजूर केली खरी तरीही सध्या ती लाल फितीत अडकून पडली आहे. दर महिन्याला पाणीपट्टी वसूल करूनही मनोरवासिय गढूळ पाणीच पिताना दिसत आहेत.
गेल्या 35 ते 4क् वर्षापासून मनोर परिसरातील नागरिक पावसाळय़ात गढूळ पाणी पीत आहेत. यंदाही मोठय़ा प्रमाणात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने माङो कुटुंबिय आजारी पडले आहेत. अशाच प्रकारे मनोरमध्ये शेकडो लोक आजाराने त्रस्त आहेत मात्र ग्रामपंचायत शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही.
- इकबाल चिखलेश्वर, उपाध्यक्ष अल्पसंख्याक ठाणो, जिल्हा ग्रामीण.
पाण्यात मातीचा थर
बादलीमध्ये पाणी भरल्यावर त्यातून दीड ते दोन इंच तळाला मातीचा थर जमा होतो. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याला उत्तर मिळत नाही. आता जगायचे तरी कसे ? असा प्रश्न पडत आहे.
- लक्ष्मण चौधरी, ग्रामस्थ