हृदयरोग चिकित्सेत नव्या तंत्रज्ञानाची भर पडल्याने उपचार सुकर!

By Admin | Updated: September 30, 2014 01:43 IST2014-09-30T01:43:40+5:302014-09-30T01:43:40+5:30

काही वर्षापूर्वीर्पयत क्लिष्ट वाटणारी, महागडी असणारी अॅन्जिओप्लास्टी, बायपास सजर्री आता सुकर आणि कमी खर्चात होत आहे.

Treatment of cardiovascular therapy with the help of new technology! | हृदयरोग चिकित्सेत नव्या तंत्रज्ञानाची भर पडल्याने उपचार सुकर!

हृदयरोग चिकित्सेत नव्या तंत्रज्ञानाची भर पडल्याने उपचार सुकर!

>पूजा दामले - मुंबई 
काही वर्षापूर्वीर्पयत क्लिष्ट वाटणारी, महागडी असणारी अॅन्जिओप्लास्टी, बायपास सजर्री आता सुकर आणि कमी खर्चात होत आहे. याचे मुख्य कारण भारतामध्ये आलेले तंत्रज्ञान आणि स्टेंटची कमी झालेली किंमत हे आहे. पालिका रुग्णालयांमध्येही नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
मुंबईमध्ये हृदयविकार रुग्णांची संख्या वाढते आहे. नवीन शोधांमुळे, तंत्रज्ञानामुळे हृदयविकाराची शस्त्रक्रिया, उपचार सुकर झाले आहेत. अॅन्जिओप्लास्टीमध्ये बलूनच्या ऐवजी आता स्टेंटचा वापर केल्यामुळे यशाचा टक्का वाढतो आहे, असे केईएम रुग्णालयाच्या हृदयरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी सांगितले.   
काही वर्षापूर्वीर्पयत अॅन्जिओप्लास्टी करताना बलूनचा वापर केला जायचा. हा बलून हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये सोडला जायचा. यामुळे शस्त्रक्रिया केल्यावर 24 ते 48 तासांत रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण हे सुमारे 4 टक्के इतके होते. मात्र गेल्या 2 दशकांपासून स्टेंटचा वापर होत आहे. सध्या स्टेंटच्या चौथ्या जनरेशनचा वापर उपचारांसाठी केला जात आहे. चौथ्या जनरेशनच्या स्टेंटची किंमत जास्त असल्यामुळे काही खासगी रुग्णालयात वापर होतो. मात्र पालिका रुग्णालयांमध्ये हे स्टेंट वापरले जात नाहीत. सर्वात आधी आलेले स्टेंट हे त्या रक्तवाहिन्यांमध्येच राहायचे. यानंतरच्या जनरेशनमध्ये आलेले स्टेंट हे विरघळून जातात. हृदयाच्या उपचारासाठी काहीवेळा हृदयाच्या काही वाहिन्या या बंद केल्या जातात. काहीवेळा हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये कमी प्रमाणात अल्कोहोल सोडून कृत्रिम हृदयविकाराचा झटका निर्माण करून उपचार करतात. हृदयाचा अपेंडिक्स अनियमित झाल्यास रक्तात गुठळ्य़ा निर्माण होऊ शकतात. याचा थेट परिणाम मेंदूवर होऊन अशावेळी स्ट्रोक होऊ शकतो. यावर उपचार म्हणजे तो अपेंडिक्स बंद केला जातो, असे डॉ. केरकर यांनी सांगितले.    
 
हृदयविकाराची कारणो  
आनुवंशिक,  जीवनशैली, तंबाखू खाण्याची सवय, मद्यप्राशन, धूम्रपान, सतत बसून काम करणो, स्थूलता, मानसिक ताणतणाव, चुकीची आहारपद्धती आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तातील चरबी वाढणो   
 
हृदयविकार कसा टाळू शकता? 
स्थूलता कमी करा  - तळलेले पदार्थ खाणो टाळा, (उदा - वडापाव, भजी)  - तंबाखू खाणो सोडा  - धूम्रपान करू नका  - व्यायाम करा, चाला  - मीठ कमी खा  - रक्तदाबावर नियंत्रण ठेवा  - मधुमेह वाढू देऊ नका  - जास्त मानसिक ताण घेऊ नका  - रक्तातील चरबीची (लिपीड) तपासणी करून घ्या  - रक्ताच्या नातेवाइकांना कोणाला हृदयविकार असल्यास अधिक काळजी घ्या 
 
डॉक्टरांनी हे करू नये : अनेकदा महापालिका रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण हे ईसीजी अहवाल घेऊन येतात. या अहवालामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झालेले असते. त्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यावर थ्रोम्बोलसिस हे औषध देणो गरजेचे असते. कारण औषधामुळे रक्तातली गुठळी पातळ होण्यास मदत होते. मात्र रक्त जास्त पातळ होऊन रक्तस्त्रव होण्याची शक्यता असल्यामुळे डॉक्टर हे औषध देत नाहीत. प्राथमिक उपचार करून पाठवतात, हे योग्य नाही़ यामुळे रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणो आहे.   

Web Title: Treatment of cardiovascular therapy with the help of new technology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.