फोनवरून धमकावणारी महिला गजाआड
By Admin | Updated: July 10, 2014 02:37 IST2014-07-10T02:37:16+5:302014-07-10T02:37:16+5:30
25 लाख दे नाहीतर परिणाम वाईट होतील, अशा धमक्या देऊन पश्चिम उपनगरातील एका बिल्डरला हादरून सोडलेल्या महिलेसह एकूण तिघांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली.

फोनवरून धमकावणारी महिला गजाआड
मुंबई : मी बंगल्यावरून बोलतेय, निवडणुकीसाठी पक्षाला 25 लाख दे नाहीतर परिणाम वाईट होतील, अशा धमक्या देऊन पश्चिम उपनगरातील एका बिल्डरला हादरून सोडलेल्या महिलेसह एकूण तिघांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. लाजवंती हरदासानी (35) असे या महिलेचे नाव आहे. राज्यातील एका प्रमुख राजकीय पक्षाशी संबंधित महिलेच्या नावे लाजवंतीने मुंबईतल्या चार ते पाच बिल्डरांकडून खंडणी उकळल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.
प्रकाश मेहता, सिद्धेश सामंत अशी लाजवंतीच्या साथीदारांची नावे आहेत. गुन्हे शाखेतून मिळालेल्या माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी सिद्धेश असून दोन वर्षापूर्वी अशाच गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानेच लाजवंती आणि मेहता यांना या गुन्ह्यासाठी तयार केले होते.
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना लाजवंतीने गोरेगावमधील बांधकाम व्यावसायिकाला पहिला फोन केला. मी बंगल्यावरून बोलते आहे. निवडणुकीसाठी पक्षाला 25 लाख हवेत. पैसे दिले नाहीस तर परिणाम वाईट होतील, अशा शब्दांत धमकावले. त्या वेळेस बिल्डरने वडिलांच्या आजारपणाचे कारण पुढे करीत पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर लाजवंतीने थेट 4 ते 7 जुलैदरम्यान बिल्डरला सतत फोन करून धमकावले. प्रत्येक वेळी तिने मी बंगल्यावरून बोलते, असा उल्लेख केला. 8 जुलैला पुन्हा फोन करून माझा मानून पैसे घेण्यासाठी ऑफिसमध्ये येतोय़ पैसे दिले नाहीस तर ठार मारू, ऑफिसमध्ये धमाका करू, असे धमकावले. या धमकीनंतर संबंधित बिल्डरने दिंडोशी पोलीस ठाण्याकडे तक्रार दिली. पुढे हे प्रकरण गुन्हे शाखेच्या अंधेरी युनिटकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले. साहाय्यक आयुक्त सुनील देशमुख यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे, निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ, राजू कसबे, रजनी साळुंके व अन्य अधिका:यांचे विशेष पथक तयार केले.
ठरल्याप्रमाणो या पथकाने बिल्डरच्या कार्यालयात सापळा रचला. लाजवंतीच्या वतीने पैसे घेण्यासाठी तेथे आलेल्या मेहताला पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्या चौकशीतून सामंत व लाजवंतीची नावे फुटली. बुधवारी सकाळी विरार, भाईंदर येथून या दोघांना गजाआड केले. प्राथमिक चौकशीत या तिघांनी अशाच पद्धतीने बोरीवली, कांदिवली, अंधेरी येथील चार ते पाच बिल्डर, व्यावसायिकांकडून पक्षासाठी अॅम्ब्युलन्स हवी, असे सांगून खंडणी उकळल्याची माहिती पुढे आली आहे. या तिघांकडून चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)
ग्रॅज्युएट लाजवंती
च्विरारला राहणा:या लाजवंतीने शहरातील प्रसिद्ध महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. विरारमधील एका दुकानात ती सेल्सगर्ल म्हणून कार्यरत होती. झटपट पैसा कमावण्यासाठी ती या गुन्ह्यात सहभागी झाली. दुसरीकडे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सिद्धेश तिचा शेजारी होता. लाजवंतीचे रोखठोक बोलणो त्याने हेरले होते. पुढे पैशांचे आमिष दाखवून सिद्धेशने तिचे माथे भडकावले, फोनवरून धमकी देण्यासाठी प्रशिक्षितही केले.