रायगड जिल्हा परिषदेवर बारीक लक्ष - सुनील तटकरे
By Admin | Updated: July 11, 2014 00:09 IST2014-07-11T00:09:28+5:302014-07-11T00:09:28+5:30
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल सप्टेंबर महिन्यात संपत आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

रायगड जिल्हा परिषदेवर बारीक लक्ष - सुनील तटकरे
नांदगाव : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल सप्टेंबर महिन्यात संपत आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या संबंधीचा कार्यक्र म चार पाच दिवसात जाहीर होईल. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल सप्टेंबरमध्ये संपत असून त्याच महिन्यात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत मंत्रिमंडळ विचार करीत असल्याचे सूतोवाच देवून रायगड जिल्हा परिषदेवर आपले बारकाईने लक्ष असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
रायगड जिल्हय़ातील कार्यकत्र्याची नवीन पालकमंत्री सचिन अहिर यांची ओळख व्हावी यासाठी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तटकरे कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर रायगडचे पालकमंत्री सचिन अहिर, कर्जतचे आमदार सुरेश लाड, आमदार अनिल तटकरे, जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, भाई पाशिलकर, प्रकाश धुमाळ, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस स्मिता भेंडकर, तालुकाध्यक्ष भरत बेलोसे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, नगराध्यक्ष कल्पना पाटील, आदिंसह जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक मोठय़ा संख्येने हजर होते.
तटकरे म्हणाले, 2क्क्4 व 2क्क्9 मध्ये रायगड जिल्हय़ात राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारकीच्या तीन जागा लढवल्या आहेत. तीनपैकी दोन जागांवर आमदार निवडून आले. परंतु यंदाच्या होणा:या विधानसभा निवडणुकीत चार जागेची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेसाठी राष्ट्रवादीला 144 जागा मिळायलाच हव्या अशी आमची ठाम भूमिका असल्याचे सांगितले.