भारनियमनमुक्त ठाणे जिल्हा हेच उद्दीष्ट
By Admin | Updated: May 30, 2015 22:30 IST2015-05-30T22:30:18+5:302015-05-30T22:30:18+5:30
वीज हा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून पावसाळा तोंडावर आला आहे, त्यादृष्टीने युद्धपातळीवर तयारी करणे आवश्यक बनले आहे.
भारनियमनमुक्त ठाणे जिल्हा हेच उद्दीष्ट
ठाणे : वीज हा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून पावसाळा तोंडावर आला आहे, त्यादृष्टीने युद्धपातळीवर तयारी करणे आवश्यक बनले आहे. १०० टक्के भारिनयमनमुक्त ठाणे जिल्हा हेच आपले उद्दीष्ट असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाणे जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत केले.
वीज वितरण क्षेत्रातील सुधारणा अधिक प्रभावीपणे अमलात याव्यात आणि ग्राहकांच्या तक्र ारींची वेळीच तड लागावी, यासाठी राज्य सरकारने केंद्रीय वीज कायदा २००३ नुसार या समितीची स्थापना केली असून या समितीची पहिली बैठक शनिवारी पार पडली. यावेळी आमदार गणपत गायकवाड, शांताराम मोरे, नरेंद्र पाटील, आमदार पांडुरंग वरोरा, ज्योती कलानी, ठाणे ग्रामिण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
वीज ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा मिळावी, यासाठी वीज वितरण कंपनी आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधण्यासाठी अशा प्रकारची समिती महत्त्वाची असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधींच्या तक्र ारींची, त्यांच्या सूचनांची वेळीच दखल घ्या. विकास कामांची आखणी करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, जेणेकरून ज्या ठिकाणी लोकांचा विरोध असेल तिथे त्यांना त्या कामाची गरज लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पटवून देणे शक्य होईल असेही शिंदे यांनी सांगितले.
सदोष मीटरमुळे वाढीव वीज बिल आल्यास आधी बिल भरण्याचा आग्रह केला जातो. त्याऐवजी आधी सुधारित बिल ग्राहकाला देण्याची व्यवस्था केली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
पावसाळा तोंडावर असल्यामुळे जुने खांब, तारा यांचे वेळीच सर्वेक्षण करून उपाययोजना हाती घ्याव्यात, पावसाळ्यात झाड पडून वीजप्रवाह खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे वेळीच वृक्षछाटणी मोहीम हाती घ्यावी, रात्री १२ नंतर महावितरणच्या कॉलसेंटरमध्ये कोणीही नसते, या तक्र ारीची दखल घेऊन या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात असली पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले.