स्थानकांमधील अपघात रोखणार
By Admin | Updated: May 22, 2014 03:08 IST2014-05-22T03:08:55+5:302014-05-22T03:08:55+5:30
रेल्वे स्थानकांत रूळ ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात होतात. ते रोखण्यासाठी एमआरव्हीसीने ( जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सच्या सहकार्याने २0१२ मध्ये एक सर्वेक्षण केले

स्थानकांमधील अपघात रोखणार
सुशांत मोरे, मुंबई - रेल्वे स्थानकांत रूळ ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात होतात. ते रोखण्यासाठी एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सच्या सहकार्याने २0१२ मध्ये एक सर्वेक्षण केले आणि त्याचा प्रस्ताव तयार केला. यावर एमआरव्हीसीने काम सुरू केल्यानंतर जे.जे. स्कूल आॅफ आटर््सच्या साहाय्याने पुन्हा याच विषयावर दुसरा सर्व्हे केला आहे. सोयीसुविधांअभावी दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना होणार्या प्रवाशांच्या अपघातांचा आणि स्थानकांचा दुसरा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार त्या ठिकाणी एमआरव्हीसीकडून सुविधा दिल्या जातील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. दोन स्थानकांमध्ये प्रवाशांचे अपघात होत असलेल्या २१ ठिकाणांचा सर्व्हे जे.जे. स्कूल आॅफ आटर््सकडून केला आहे. रेल्वे रूळ ओलांडताना प्रत्यक्षात स्थानकांमध्येच मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला. यासाठी एमआरव्हीसीने २०१२ मध्ये जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सला अशा स्थानकांच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. त्यानुसार, मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या १२ स्थानकांमध्ये अपघात होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, एमआरव्हीसीने तब्बल २०० कोटींपेक्षा जास्त किमतीचा प्रकल्प तयार करून रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी या स्थानकांवर सुविधा देण्याचा निर्णय घेतला. प्रस्तावानुसार पादचारी पूल, सरकते जिने या स्थानकांवर देतानाच स्कायवॉक आणि पादचारी पुलांना जोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यावर, कामही सुरू करण्यात आले आहे. स्थानकांमध्ये रूळ ओलांडताना अपघात होत असतानाच दोन स्थानकांदरम्यानही अशा पद्धतीने अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने त्या ठिकाणी सुविधा आणि उपाययोजना देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. त्यासाठी एमआरव्हीसीने दोन स्थानकांदरम्यानची ठिकाणे शोधण्यासाठी जे.जे. स्कूल आॅफ आटर््सच्या साहाय्याने सर्वेक्षण केले. सहा महिन्यांत केलेल्या सर्वेक्षणानंतर आठवड्यापूर्वीच या सर्वेक्षणाचा अहवाल एमआरव्हीसीला सादर करण्यात आला. यामध्ये दोन स्थानकांदरम्यान वर्षाला सर्वाधिक अपघात होणारी २१ ठिकाणे निदर्शनास आली आहेत. या स्थानकांदरम्यान कुठल्याही सोयीसुविधा नसल्याने किंवा रूळ ओलांडणे रोखण्यासाठी ठोस उपाय नसल्यानेच हे अपघात होत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. यामध्ये पश्चिम रेल्वेवरील ४, मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर ११, हार्बरवर ५ आणि ट्रान्स-हार्बरवरील एका स्थानकाचा समावेश आहे. सर्वाधिक अपघात होणार्यांमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी ते गोरेगाव, माटुंगा ते माहीम, मध्य रेल्वे मेन लाइनवरील ठाणे ते कळवा, घाटकोपर ते विक्रोळी, मुंब्रा ते दिवा जंक्शन, हार्बरवरील टिळकनगर ते चेंबूर आणि गोवंडी ते मानखुर्दचा समावेश आहे.