स्वच्छतेचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवा
By Admin | Updated: June 12, 2014 01:27 IST2014-06-12T01:27:19+5:302014-06-12T01:27:19+5:30
पाणी गुणवत्ता आणि स्वच्छतेचा संदेश जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवावा असे मार्गदर्शन, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी येथे बोलताना केले.

स्वच्छतेचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवा
अलिबाग : पाणी गुणवत्ता आणि स्वच्छतेचा संदेश जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवावा असे मार्गदर्शन, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी येथे बोलताना केले.
रायगड जिल्हा परिषद अलिबाग ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता विभाग,आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पाणी पुरवठा गुणवत्ता कार्यशाळेचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांचे हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्र मास अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार कोळी, अतिरिक्त जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ.सुर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मिसाळ म्हणाले, प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यक्रमाचे आयोजन करुन पाणीगुणवत्ता आणि स्वच्छतेचा संदेश ग्रामीण जनतेपर्यंत पोहचवून जनसामान्य माणसांमध्ये जनजागृती निर्माण करावी. पाणी दूषित होण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यासाठी पिण्याचे पाण्याचे महत्व जिल्ह्यातील जनेतला समाजावून सांगावे. शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते, दूषित पाणी पुरवठा असलेल्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते, गावामध्ये पाण्याचे स्त्रोत दूषित नाहीत परंतु अस्वच्छता आढळते त्या गावांना पिवळे कार्ड दिले जाते.
जिल्ह्यामध्ये गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांनी पाणी गुणवत्ता विषयक कार्यक्र म प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त प्रमाणात हिरवे कार्ड मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पाण्याच्या गुणवत्तेसाठी निर्जंतुकीकरण करुन गुणवत्ता टिकवणे आवश्यक असल्याचे मिसाळ म्हणाले. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छ व शुध्द पाणी देण्यासाठी प्रयत्न करावेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्र माला जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)